फळे-भाजीपाला निर्जंतुक कराः सुनील केदार

शेतकऱ्यांकडून भाजीपाला व फळे उत्पादित केल्यानंतर ग्राहकांपर्यंत पोचताना त्यांची अनेकांकडून हाताळणी होते.
sunil kedar
sunil kedar

नागपूर ः शेतकऱ्यांकडून भाजीपाला व फळे उत्पादित केल्यानंतर ग्राहकांपर्यंत पोचताना त्यांची अनेकांकडून हाताळणी होते. त्या पार्श्‍वभूमीवर बाजार समिती प्रशासनाने फळे व भाजीपाला निर्जंतुकीकरणाची कार्यवाही करावी, अशी सूचना पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी केली. कळमना येथील जवाहरलाल नेहरु मार्केटयार्ड बाजार समितीला त्यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत बाजार समिती सचिव राजेश भुसारी होते. शहरासह राज्यात गेल्या १७ दिवसांपासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे नागरिकांना अत्यावश्‍यक सेवा सहज उपलब्ध होणे आवश्‍यक आहे, त्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.  शेतमाल उत्पादक शेतकरी, अडते आणि किरकोळ भाजी विक्रेत्यांना मास्क लावण्यासह सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत त्यांनी सूचना केली. लॉकडाऊनच्या सुरुवातीला काही अडते व भाजी विक्रेत्यांनी कृषी उत्पादनाच्या खरेदी विक्रीवर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र अत्यावश्‍यक सेवा देण्यात जाणीवपूर्वक अडथळा आणण्यात येत असल्याच्या कारणावरून परवाने रद्द केले जातील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यानंतर अडते व भाजी विक्रेत्यांनी व्यवहार सुरळीत ठेवल्याची माहिती राजेश भुसारी यांनी दिली.  लॉकडाऊनच्या काळात भेंडी, गवार, कोथिंबीर, कोबी, भोपाळा यासह आंबा, डाळिंब, अननस, फणस अशी विविध फळे तसेच कृषिमाल मसालेजन्य पदार्थ मुबलक प्रमाणात येत असल्याने नागरिकांनी काळजी करु नये, असेही भुसारी यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com