इंधनाचे दर आमच्या हातात नाहीत : केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद

इंधनाचे दर आमच्या हातात नाहीत : केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद
इंधनाचे दर आमच्या हातात नाहीत : केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद

नवी दिल्ली : इंधनाचे दर नियंत्रणात ठेवणे हे सरकारच्या हातात नाहीत, असे सांगत केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी हात झटकले. तसेच, काँग्रेसने इंधन दरवाढीविरोधात पुकारलेल्या बंदला जनतेचा पाठींबा नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसनेच्या आंदोलनानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.   रवीशंकर प्रसाद पुढे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय कारणांमुळे इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. इंधनाचे दर हे तेल कंपन्यांच्या उपलब्धतेवर अवलंबून आहेत. तसेच, ही बाब देशाच्या जनतेला ठाऊक आहे म्हणूनच त्यांनी विरोधकांच्या बंदला प्रतिसाद दिलेला नाही असेही रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. आज जो बंद पुकारला आहे त्यात देशाचे नुकसान होते आहे. बिहार या ठिकाणी रुग्णवाहिकेमध्ये एक मुलगा अडकल्याने मरण पावला आहे. याला राहुल गांधीच जबाबदार असल्याचा आरोपदेखील त्यांनी यावेळी केला. त्याचबरोर, अनेक ठिकाणी बसेस जाळल्या जात आहेत. पेट्रोल पंपांची तोडफोड केली जाते आहे या सगळ्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, मनमोहनसिंग यांना थेट आव्हान देताना रवीशंकर प्रसाद यांनी त्यांच्यासोबत अर्थिक गोष्टींवर संसदेत चर्चा करायला तयार असल्याचे म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com