नागपूर जिल्ह्यात ‘जलयुक्‍त'ला निधीटंचाईच्या झळा

नागपूर जिल्ह्यात ‘जलयुक्‍त'ला निधीटंचाईच्या झळा
नागपूर जिल्ह्यात ‘जलयुक्‍त'ला निधीटंचाईच्या झळा

नागपूर : जलयुक्‍त शिवारच्या कामाला निधीटंचाईच्या झळा बसत असल्याने मुख्यमंत्र्यांच्या या महत्त्वाकांक्षी संकल्पनेच्या अंमलबजावणीला खीळ बसली आहे. 

दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारने जलयुक्‍त शिवार हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला. पाच वर्षांत पाच हजार गावे दुष्काळमुक्‍त करण्याचे यावर प्रस्तावित होते. त्यानुसार नागपूर जिल्ह्यात पहिल्यावर्षी ३१३ गावांची निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागामार्फत ६६६ कामे हाती घेण्यात आली. ती पूर्ण करण्यात आली. वर्ष २०१६-१७ मध्ये १८५ गावांमध्ये २२५ कामे पूर्ण करण्यात आली. त्यानंतर २०१७-१८ या वर्षात २२० गावांमध्ये २८५ कामे हातात घेण्यात आली. निधी न मिळाल्याने २५२ कामेच पूर्ण झाली. ३३ कामे अद्याप शिल्लक आहेत. यंदा २०१८-१९ मध्ये १७० गावांत २१९ कामे निश्‍चित करण्यात आली. यासाठी प्रशासनाकडून ३८ कोटी २७ लाखांच्या निधीचा प्रस्ताव देण्यात आला.

शासनाकडून या कामासाठी डिसेंबर महिन्यात ११ कोटी २२ लाखांचा निधी देण्यात आला. विशेष म्हणजे याच निधीतून मागील वर्षातील ३३ कामांसाठी निधी द्यायचा आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कामावर दीड ते दोन कोटी रुपये खर्च येण्याची शक्‍यता आहे. जलयुक्‍तमध्ये निवडलेल्या गावातील २१२ कामांच्या संदर्भात जिल्हा परिषदेने निविदा काढल्या आहेत. यासाठी २५ ते ३० कोटींचा निधी लागणार आहे. शासनाकडून मिळालेला निधी अपुरा असून, तो तीन महिन्यात खर्च करावा लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com