मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला चांगला भाव मिळून शेतकऱ्यांना थोडाफार फायदा होण्यास सुरवात झाली. तोच केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी लादून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी कांदा निर्यातबंदीचा निषेध करुन त्याच्या आध्यादेशाची सोमवारी (ता.२१) अंत्ययात्रा काढली.
कांदा निर्यातबंदी निषेधार्थ अंत्ययात्रेला सटाणा नाका भागातून सुरवात झाली. तर, सटाणा रस्ता, साठफुटी रस्त्यावरुन तिरडी मोर्चा तहसिलदार कार्यालयावर पोचला. या ठिकाणी पोलिसांनी मोर्चा अडविला. यावेळी शासनाच्या धोरणाविरुध्द शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.
राज्य कांदा उत्पादक संघटनेचे तालुकाध्यक्ष शेवाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसिलदारांना निवेदन दिले. केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यात बंदी आदेश त्वरित मागे घ्यावा. शेतकऱ्यांवर होणारा अन्याय त्वरित दूर करून न्याय मिळवून द्यावा, अशी भावना व्यक्त करण्यात आली. यावेळी प्रतिनिधिक स्वरूपात शेतकरी ट्रॅक्टरवर गळफास लावून आत्महत्या करीत असल्याचे दाखविण्यात आले. मोर्चात कांदा उत्पादक शेतकरी नरेंद्र शेवाळे, मधुकर शेवाळे, विरकुमार शेवाळे सहभागी झाले.
केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांना शेती विकासाचे स्वप्न दाखवून पुन्हा सत्तेत आले. सरकारची प्रत्यक्ष कृती मात्र शेतकरी विरोधी आहे. - चंद्रकांत शेवाळे, तालुकाध्यक्ष, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.