बुरशीनाशकाची आळवणी फायदेशीर : डॉ. पाटील

बुरशीनाशकाची आळवणी फायदेशीर : डॉ. पाटील
बुरशीनाशकाची आळवणी फायदेशीर : डॉ. पाटील

जालना : ‘‘सद्यस्थितीत मोसंबी झाडावर अंबिया बहराची फळे आहेत. पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाण्याच्या ताणामुळे झाडे सुकण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. ही झाडे जिवंत ठेवण्यासाठी बुरशीनाशकाची आळवणी करणे फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. संजय पाटील यांनी केले. 

खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांच्या चमूने शुक्रवारी (ता. २६) बदनापूर येथील संशोधन केंद्राच्या मोसंबी प्रक्षेत्रास भेट दिली. या चमूमध्ये केंद्राचे प्रमुख श्रीकृष्ण सोनुने, कृषी अभियंता प्रा. पंडित वासरे, प्रा. अजय मिटकारी, शिरीष चौधरी, अजित कुर्हे आदी उपस्थित होते. 

डॉ. पाटील म्हणाले, ‘‘झाडे सुकण्याची स्थिती दिसताच झाडावरील फळांचा भार कमी करून फळे तोडून बागेबाहेर टाकावीत. एक बहार असताना मृगाची फळे घेण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा झाडाची शक्ती खर्च होऊन ते अशक्त बनते. परिणामी झाडे वाळण्याचे प्रमाण वाढीस लागते.`` 

प्रा. वासरे म्हणाले, ‘‘मोसंबी पीक पाण्यास अतिसंवेदनशील असल्याने झाडाचे पाणी व्यवस्थापन चांगले असावे.मोसंबी पिकावरील किडीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकाची मात्रा योग्य तीव्रतेत घेऊन फवारणी करावी. ``

सोनुने यांनी मोसंबी बागायतदारांनी झाडे जिवंत ठेवण्यावर भर द्यायला हवा, असे सांगितले. या वेळी केंद्रातील कृषी पर्यवेक्षक सारिका सांगळे, नवनाथ बोनदले, संदीप भोगील आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com