रेशीम उत्पादकांचे उपोषण अखेर सुटले

रेशीम उत्पादकांचे उपोषण अखेर सुटले
रेशीम उत्पादकांचे उपोषण अखेर सुटले

जालना : मनरेगाअंतर्गत मिळणारे पेमेंट मिळण्यासाठी निवेदन देऊनही उपयोग झाला नाही. त्यामुळे बुधवारपासून (ता. १३) पानेवाडी येथील रेशीम कोष उत्पादकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्यायासाठी सुरू केलेले उपोषण रात्री मागे घेण्यात आले.  

पानेवाडी येथील लाभार्थ्यांनी एमआरईजीएसअंतर्गत रेशीम उद्योग सुरू केला. त्यासाठी एक वर्षापूर्वी शेड बांधकाम करून रेशीम उद्योग सुरू केला. परंतू अनेक शेतकऱ्यांचे रेशीम शेड बांधकामाचे अकुशल पेमेंट देयक बाकी आहे. शिवाय मजुराचे मस्टरचे पेमेंटही गेल्या चार महिन्यांपासून मूल्यांकन होऊनही बाकी आहे.

तुतीसाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करून चार महिन्यांचा कालावधी उलटूनही आजपर्यंत पेमेंट दिले नाही. यासंदर्भात १५ सप्टेबर २०१८ व २४ जानेवारी २०१९ ला निवेदन दिले. परंतू त्याचा उपयोग झाला नाही. गावातील रेशीम कोष उत्पादकांच्या एमआरइजीएसअंतर्गत पेमेंटचा निर्णय न लागल्यास जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा पानेवाडीच्या रेशीम कोष उत्पादकांनी दिला होता. 

एकीकडे रेशीम उद्योगच शेतकऱ्यांना दुष्काळाच्या संकटात आधार बनल्याचे चित्र दिसत आहे. या उद्योगासाठीच्या योजनेंतर्गत मिळणाऱ्या लाभासाठी होणारा विलंब शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा ठरला आहे. पहिल्याच दिवशी जवळपास चाळीस शेतकरी या उपोषणात सहभागी झाले. येत्या तीन आठवड्यात रोहयो अंतर्गत मजुरीचा प्रश्न व इतर प्रश्न मार्गी लावण्याच्या आश्वासनाने आंदोलकांनी बुधवारी (ता.१३) रात्री उपोषण मागे घेतले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com