साताऱ्यात तलाव, धरणांतून काढला सहा लाख घनमीटर गाळ

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा  : शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेल्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचे काम जिल्ह्यात गतीने सुरू आहे. १३४ तलाव, धरणांतून सहा लाख १९ हजार घनमीटर गाळ आतापर्यंत काढण्यात आला आहे. त्यामुळे चांगला पाऊस झालेल्या गावांतील तलाव तुडुंब भरून गावे ‘जलयुक्‍त’ झाली आहेत. शिवाय दुष्काळी खटाव तालुक्‍यात या योजनेतून सर्वाधिक ३३ कामे झाली असून, त्यातून पावणेतीन लाख घनमीटर इतका गाळ काढण्यात आला आहे.

राज्य शासनाने ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबविली आहे. यामध्ये छोटी धरणे, तलावांतील गाळ काढून तो शेतकऱ्यांना शेतात टाकण्यासाठी दिला जातो. गाळ वाहतुकीचा खर्च हा संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना करावा लागतो. इंधनासह इतर खर्च शासन व सीएसआर निधीतून देण्यात येतो. सातारा जिल्ह्यात इंधनासाठी २२ लाखांचा खर्च करण्यात आला आहे. तलाव, धरणांमध्ये साचलेला गाळ काढून तो शेतात पसरविल्यास धरणांची मूळ साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला आहे.

"जलसंवर्धनातून समृद्धी''चा संकल्प असलेली ही योजना जिल्ह्यातील १२५ गावांमध्ये राबविली आहे. खटाव तालुक्‍यात ५० कामे मंजूर असून, त्यातील ३३ कामे पूर्ण झाली आहेत. त्यापाठोपाठ माणमधील तलावांमधून एक लाख १५ हजार घनमीटर, कऱ्हाडमधील तलाव, धरणांमधून ६१ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.  

तालुकानिहाय पूर्ण कामे (कंसात गावांची संख्या)  :  खटाव ३३ (२१), कऱ्हाड २७ (१४), खंडाळा ४ (१२), कोरेगाव १८ (१४), माण १९ (२१), पाटण ९ (१५), फलटण १२ (१२), सातारा १० (९), वाई २ (७).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com