वडापूर बंधाऱ्याचे दरवाजे गेले वाहून

वडापूर बंधाऱ्यातील पाण्यावर या भागातील हजारो हेक्‍टरवरील शेतकऱ्याचे जीवन अवलंबून आहे. त्याकडे पाटबंधारे खात्याकडून वारंवार दुर्लक्ष होत आहे. यापूर्वी भराव वाहून गेला, तर आता दरवाजे वाहून गेले. यामुळे भविष्यात पाणीसाठ्यावर प्रश्‍नचिन्ह असले, तरी संबंधित खात्याने तातडीने पर्यायी व्यवस्था करून दरवाजे उपलब्ध करावे. याकडे दुर्लक्ष केल्यास शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल. - अनिल बिराजदार, शेतकरी
वडापूर बंधाऱ्याचे दरवाजे गेले वाहून
वडापूर बंधाऱ्याचे दरवाजे गेले वाहून

मंगळवेढा, जि. सोलापूर : वडापूर बंधाऱ्यावर काढून ठेवलेले दरवाजे भीमा नदीला आलेल्या पुराने वाहून गेले. त्यामुळे भविष्यात या भागातील बागायत शेतीला याचा मोठा फटका बसणार आहे. पाटबंधारे खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे ही घटना घडल्याची बोलले जाते. जुलै महिन्यात या बंधाऱ्याचा भराव वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच आता ही बाब समोर आली. 

लाभक्षेत्रात पडलेल्या पावसामुळे उजनीतून ३० हजार, तर वीरमधून ५४ हजार ४७८ क्‍युसेक पाणी भीमा नदीत सोडल्यामुळे सध्या तालुक्‍यामध्ये नदीला पूर आला आहे.

सुरक्षिततेचा उपाय म्हणून वडापूर बंधाऱ्यावरील बंधाऱ्याचे दरवाजे ऑक्‍टोबरमध्ये पुन्हा बसविण्यासाठी बंधाऱ्यावर काढून ठेवले होते. परंतु पुरादरम्यान ते उचलून न नेल्यामुळे ते वाहून गेले. त्यामुळे पावसाळ्यानंतर पाणी साठवण्याच्या दृष्टीने पाटबंधारे खात्याकडून मंजुरी घेऊन नवीन दरवाजे करण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे या भागातील शेतीला पाणीटंचाईचे संकट जाणवणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com