नियमित कर्जदारांना द्या ५० हजाराचे अनुदान : भाजप

कोरोनामुळे प्रभावीत शेतीक्षेत्राला दिलासा देण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. त्यासोबतच नियमित कर्जदार शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान मिळावे.
bank
bank

गोंदिया ः कोरोनामुळे प्रभावीत शेतीक्षेत्राला दिलासा देण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. त्यासोबतच नियमित कर्जदार शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान मिळावे, अशी मागणी भाजपतर्फे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना करण्यात आली आहे.  सडकअर्जुनी उपविभागीय अधिकाऱ्यांना या संदर्भाने निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार, केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहिर करावे. ग्रामीण भागात रोजगाराची उपलब्धता नसल्याने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील कामे त्वरित सुरु करण्यात यावी. घरकुल बांधकामासाठी वाळूची उपलब्धता करावी. ग्रामीण भागातील घरगुती व कृषीचे वीजबिल माफ करावे. स्वस्त धान्य दुकानातून चांगल्या प्रतीच्या अन्नधान्याचा पुरवठा करण्यात यावा. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्‍टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई किट उपलब्ध करुन देण्यात याव्यात. बाहेरी राज्य व जिल्हयातून येणाऱ्या नागरिकांना १४ दिवस क्‍वारंटाईन करुन ठेवण्यासाठी व्यवस्था करावी. महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजनेत थकीत कर्जदारांचा विचार करण्यात आला. परंतू नियमीत कर्जदारांना कोणत्याच प्रकारचा दिलासा या कर्जमाफी योजनेत दिलेला नाही. त्यामुळे नियमीत कर्जदारांना ५० हजार रुपयांचे अनुदान त्वरित देण्यात यावे, अशी मागणी देखील भाजपने केली आहे.  शिष्टमंडळात सडकअर्जुनी तालुकाध्यक्ष अशोक लंजे, राजेश कठाणे, शिशिर येडे, चेतना वडगाये, गीता कापगते, प्रशांत शहारे यांचा समावेश होता. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com