वीजबिलात शेतकऱ्यांना सवलत द्या

अधिवेशन संपताच शेतीपंपाच्या वीज बिलासाठी महावितरणकडून कनेक्‍शन तोडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. महावितरणने वीजबील वसुलीसाठी शेतकऱ्यांना सवलत दिली पाहिजे.
वीजबिलात शेतकऱ्यांना सवलत द्या Give concessions to farmers in electricity bills
वीजबिलात शेतकऱ्यांना सवलत द्या Give concessions to farmers in electricity bills

करमाळा, जि. सोलापूर : थकीत वीज बिलांसाठी शेतकऱ्यांचे वीज कनेक्‍शन तोडणार नाही, अशी घोषणा राज्यशासनाने सुरुवातीला केली. अधिवेशन संपताच शेतीपंपाच्या वीज बिलासाठी महावितरणकडून कनेक्‍शन तोडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. महावितरणने वीजबील वसुलीसाठी शेतकऱ्यांना सवलत दिली पाहिजे, असे प्रतिपादन खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केले.

करमाळा येथे भाजपच्या वतीने नूतन सरपंचाचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी राजेभोसले, तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, तालुका सरचिटणीस अमरजित साळुंके, शहराध्यक्ष जगदीश अगरवाल, बाजार समितीचे माजी उपसभापती जालिंदर पानसरे, रामभाऊ ढाणे, किरण बोकण, बाळासाहेब हौसिंग यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

खासदार नाईक-निंबाळकर म्हणाले, सध्या करूणाच्या संकटामुळे लोकांकडे पैसे नाहीत. शेतकऱ्यांना आणखी उसाचे पैसे मिळाले नाहीत. अशा परिस्थितीत वीजबिल माफ होतील, अशी धारणा होती. मात्र ती फोल ठरली आहे. दरम्यान, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी महावितरणच्या करमाळा व जेऊर येथील अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन शेतकऱ्यांना वीज बिलासाठी तगाद्याला न लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी महावितरणचे करमाळा विभागाचे अभियंता संजय जाधव, जेऊर विभागाचे अभियंता गलांडे उपस्थित होते.

वीजतोडणी केल्यास शेकाप उतरणार रस्त्यावर : ॲड. देशमुख सांगोला, जि. सोलापूर : विजेच्या संदर्भात महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिलासाठी वीज तोडणी करू नये. शेकाप पक्ष हा सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी कायमच लढणारा पक्ष असून महावितरणचे अधिकारी शेतकऱ्यांना वीजबिलासाठी त्रास देत असतील तर शेकाप पक्ष रस्त्यावर उतरून याविरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख यांनी दिली.

सांगोल्यात शेतकऱ्यांना शेतीपंपाची अव्वाच्या सव्वा विजबिले आलेली आहेत. तरीही हप्त्याने का होईना आज शेतकरी बील भरण्यास तयार आहे.  तरीही शेतीपंपाचे वीजतोडणी करण्याचा सपाटा लावला आहे, असेही देशमुख म्हणाले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com