उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावा : रघुनाथदादा पाटील

रघुनाथदादा पाटील
रघुनाथदादा पाटील

सांगली  ः राज्यातील ऊस उत्पादकांना प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली. ऊसदराबाबत सांगलीत १२ डिसेंबरला संघटनेची परिषद होईल, असेही त्यांनी सांगितले.

सांगली येथे शुक्रवारी (ता. २२) आयोजित पत्रकार परिषदेत श्री. पाटील बोलत होते. ते म्हणाले, की राज्यातील कोणतीही शेतकरी संघटना शेतकऱ्यांची बाजू घेण्याच्या मनःस्थितीत नाही. गुजरातमधील कारखान्यांनी दोन वर्षांपूर्वीच उसाला ४७०० रुपये दर दिला. उत्तर प्रदेशात यंदाची एसएपी ३२५० रुपये आहे. राजू शेट्टींसह शरद जोशीप्रणीत संघटनेचे अनिल घनवट एफआरपीवरच अडकले आहेत. शेट्टींनी एफआरपी अधिक मागितलेला दर एकदाही मिळालेला नाही. सरकार आणि कारखानदारांचे सर्व समर्थक आहेत. देशात, राज्यात कोणतेही सर्व सरकार कारखाने धार्जिणेच धोरण राबवते.

ते म्हणाले, की आम्ही जे ठरवतो तेच करतो. टनाला ४ हजार दर मिळाला नाही, तर चालू झालेले कारखाने आम्ही बंद पाडू. त्याबाबत शरद जोशी व बाबू गेनू यांच्या स्मृतिदिनी १२ डिसेंबरला सांगलीत संघटनेची परिषद होईल. राज्यभरातून पाच हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील. त्यात पुढील लढ्याची घोषणा केली जाईल. सध्या उसाचे हवा सोड आंदोलन आहे. आम्ही उतरलो तर टायरची चाळणीच करतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com