ग्रामीण भागातील नळ जोडणीची माहिती तात्काळ देण्याचे आदेश 

जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबाला नळ जोडणी देण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर वैयक्तिक नळ जोडणी असलेल्या कुटुंबांची माहिती नोंदवण्याचे काम सुरू आहे.
water-supply
water-supply

पुणे : जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबाला नळ जोडणी देण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर वैयक्तिक नळ जोडणी असलेल्या कुटुंबांची माहिती नोंदवण्याचे काम सुरू आहे. या संकेतस्थळावर माहिती भरण्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व गटविकास अधिकारी व उपअभियांत्यांना दिल्या आहेत.  जिल्ह्यातील सर्व कुटुंबास २०२४ पर्यंत घरगुती नळ जोडण्याद्वारे पाणी पुरवठा करण्यात येण्यासाठी जिल्हा परिषदेत आराखडा तयार करण्यात आला आहे. जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येकाला ५५ लिटर पाणी देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येकाच्या घरी नळाद्वारे पाणी देण्याचे केंद्र शासनाचा उपक्रम आहे. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सर्वेक्षण करून, जोडणी नसलेल्या घरांमध्ये नळजोडणी देण्यात येणार आहे.  सध्या अस्तित्वात असलेल्या नळ जोडणीबाबतचे प्रमाणपत्र शासनास सादर करण्यात आलेले आहे. त्या प्रमाणपत्र गटविकास अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आले आहे. त्या प्रमाणपत्रानुसार देण्यात आलेली आकडेवारीनुसार केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर कुटुंबांची माहिती तात्काळ नोंदवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com