थकीत एफआरपी द्या ः बळीराजा शेतकरी संघटना

सातारा : कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने हेक्टरी ५० हजार रूपये द्या. तसेच साखर कारखान्यांची थकित एफआरपी पूर्ण करा, या मागण्याचे निवेदन तहसीलदार अमरदीप वाकडे यांना बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले.
थकीत एफआरपी द्या ः बळीराजा शेतकरी संघटना
थकीत एफआरपी द्या ः बळीराजा शेतकरी संघटना

सातारा : कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने हेक्टरी ५० हजार रूपये द्या. तसेच साखर कारखान्यांची थकित एफआरपी पूर्ण करा, या मागण्याचे निवेदन तहसीलदार अमरदीप वाकडे यांना बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले.

उसाची एफआरपी १४ दिवसांत देणे कायद्याने बंधनकारक असतानाही जिल्ह्यातील एकाही कारखान्याने एफआरपी पूर्ण केलेली नाही. शेतकऱ्यांचे स्वतःच्या कष्टाचे पैसे असूनही सावकाराच्या दारात जावे लागते हे मोठे दुर्दैव आहे. जिल्हाधिकारी साहेब कोरोना पसरू नये म्हणून जसे काम करताय तसेच काम शेतकऱ्यांची राहिलेली एफआरपी पूर्ण करण्यासाठी करावी साखर कारखानदारांना तात्काळ बिले जमा करण्यास भाग पाडावे. आता शेतकऱ्यांचा संयम संपला आहे.

कोरोनाच्या आडून साखर कारखानदार जाणिवपूर्वक शेतकऱ्यांना बिले देण्यास विलंब करत आहे. आम्ही शांत बसणार नाही. बळीराजा शेतकरी संघटना राहिलेली उर्वरित एफआरपीसाठी आता शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठं जन आंदोलन उभा करणार आहे याची नोंद घ्यावी. व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला कामगार नेते घराळ बापू, सुनील कोळी जिल्हा उपाध्यक्ष बळीराजा शेतकरी संघटना सातारा व शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com