जनतेच्या तक्रारींसाठी द्या दोन तास - बावनकुळे
जनतेच्या तक्रारींसाठी द्या दोन तास - बावनकुळे

जनतेच्या तक्रारींसाठी अधिकाऱ्यांनो द्या दोन तास : बावनकुळे

वर्धा  ः जनतेच्या तक्रारी सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी दोन तास राखीव ठेवावे, अशाप्रकारे पहिल्या पायरीवर तक्रारींची सोडवणूक झाल्यास जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांच्याकडे येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण कमी होईल. त्याकरिता अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.  जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधला. या बैठकीला आमदार पंकज भोयर, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, जिल्हा पोलिस अधीक्षक बसवराज तेली, अप्पर जिल्हाधिकारी संजय देणे तसेच विभाग प्रमुख उपस्थित होते. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, की अगदी छोट्या छोट्या तक्रारींसाठी लोकांनी पालकमंत्र्यांकडे येणे योग्य नाही. अधिकाऱ्यांच्या पातळीवर सदर तक्रारी सुटणे आवश्‍यक आहे. तसेच तक्रारींचे निराकरण तत्काळ केल्यास नागरिकांना समाधान मिळेल, असेही त्यांनी सांगितले. समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या कंपन्यांनी विनापरवाना खासगी आणि झुडपी जंगलावरील मुरूम नेला आहे, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत. यासाठी संबंधित कंपनीची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना श्री. बावनकुळे यांनी दिल्या. राष्ट्रीय महामार्गात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांचे दावे लवकर निकाली काढण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com