अंतापूर, जि. नाशिक : सटाणा तालुक्यातील अंतापूर, ताहाराबाद, मुल्हेर व गोळवाड परिसरात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर परिपूर्ण बंद पाळण्यात आला असून त्याचा परिणाम शेती उत्पादनावर झाला आहे. प्रशासनाच्या आदेशानुसार २१ मार्चपासून या भागात दळणवळणाची सुविधा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे तयार भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने व विक्रीस अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांनी थेट भरल्या मालात शेळ्या सोडल्या आहेत.
सटाणा तालुक्यातील बिजोटे येथील शेतकरी पोपट केदा बच्छाव यांनी ४० हजार रुपये खर्च करून कोबी लागवड केली. मात्र, विक्री व्यवस्था व त्यात भावाची अडचण असल्याने उभ्या पिकात शेळ्या सोडल्या आहेत. यामुळे त्यांचा उत्पादन खर्चही वसूल न झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
तर दुसरीकडे भीतीपोटी मजूर टंचाईचा प्रश्न निर्माण झला आहे. संबंधित विभागाने उपाययोजना करावी, अशी मागणी माजी समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद पोपटराव अहिरे व मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या मालाला बाजारापर्यंत जाताना अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा, अशी मागणीही केली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.