गोदावरी नदीचा पूर ओसरला, पंचनाम्याचे आदेश

गोदावरी नदीचा पूर ओसरला, पंचनाम्याचे आदेश
गोदावरी नदीचा पूर ओसरला, पंचनाम्याचे आदेश

औरंगाबाद : गोदावरी नदीचा पूर आता ओसरला आहे. त्यामुळे झालेल्या शेती, मालमत्ता आणि इतर नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. शिवाय पूरग्रस्तांना आवश्‍यक त्या सोयी सुविधा पुरविण्याचे कामही सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

गोदावरीला आलेल्या पुरामुळे वैजापूर तालुक्‍यातील १७ व गंगापूर तालुक्‍यातील ९ वाड्या वस्त्यांमध्ये पाणी घुसले होते. पुराचा संभाव्य धोका ओळखून वैजापूर तालुक्‍यातील ९४२, तर गंगापूर तालुक्‍यातील ३८९ लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. पुराच्या पाण्यामुळे वैजापूर तालुक्‍यात नदीकाठची अंदाजे तीन हजार हेक्‍टरवरील शेतीपिके पाण्याखाली गेली.

गुरुवारी (ता. ८) पूर ओसरल्यानंतर आता नेमकी किती शेतीपिके पाण्याखाली जाऊन नुकसान झाले, यासह पुरामुळे शासकीय, खासगी मालमत्तेचे किती नुकसान झाले, याचे वस्तुनिष्ठ पंचनामे येत्या तीन दिवसांत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

गंगापूर तालुक्‍यातील स्थलांतरित ३८९ लोकांची विविध ठिकाणी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्या जेवणाची, आवश्‍यक धान्य पुरविण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातर्फे देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com