रेशीम कोषाला सोनेरी दिवस

चालू वर्षी रेशीम कोषाला सोन्याचे दिवस आले आहे. कोषाचे जवळपास प्रति किलो ६५० रुपयापर्यंत दर गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा रेशीम उद्योगाकडे कल वाढत आहे. ३० ऑक्टोबरअखेर पर्यंत ३५१९ शेतकऱ्यांनी तीन हजार ५६२ एकर तुती लागवड केली आहे.
Golden day to the silk treasury
Golden day to the silk treasury

पुणे : चालू वर्षी रेशीम कोषाला सोन्याचे दिवस आले आहे. कोषाचे जवळपास प्रति किलो ६५० रुपयापर्यंत दर गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा रेशीम उद्योगाकडे कल वाढत आहे. ३० ऑक्टोबरअखेर पर्यंत ३५१९ शेतकऱ्यांनी तीन हजार ५६२ एकर तुती लागवड केली आहे. येत्या काळात रेशीम रेशीम कोषाचे उत्पादन वाढणार असून रेशीम उद्योजकांच्या संख्येत वाढ होणार असल्याचे चित्र आहे.  

गेल्या काही वर्षांपासून रेशीम कोषाला वाढलेल्या दरामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी तुती लागवडीकडे वळत आहे. रेशीम संचालनालयामार्फत राज्यात तुती लागवडीवर भर देण्याचे ठरविले. त्यासाठी आवश्यक असलेली नोंदणीची मोहीम नोव्हेंबर २०२० महिन्यात राबविली होती. त्यासाठी पाच हजार एकराचे उद्दिष्ट ठरवले होते. अभियान सुरू झाल्यानंतर प्रत्यक्षात सुमारे १० हजार ४९८ शेतकऱ्यांनी १० हजार ५९१ एकरांवर लागवड करण्यासाठी नोंदणी केली होती. राज्यात आतापर्यंत जवळपास १५ हजार ४७५ हजार शेतकऱ्यांनी १६ हजार २६३ एकराहून अधिक क्षेत्रावर तुती लागवडी झालेल्या आहेत. गेल्या वर्षीही याच काळात ३ हजार ६३३ शेतकऱ्यांनी ३६६८ एकरांवर लागवड केली होती. मात्र चालू डिसेंबर व जानेवारी महिन्यातही लागवडी झाल्यास या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.  

यंदा रेशीम कार्यालयाकडून शेतकऱ्यांना लागवडीसाठी तुती बेण्याचे नियोजन करण्यात आले होते. कृषी आणि संलग्न क्षेत्र लॉकडाउनच्या निर्बंधांतून वगळण्यात आले होते. बियाणे, कीटकनाशके, खते विक्री करणारे दुकानदार आणि इतर आवश्‍यक बाबी शेतकऱ्यांना उपलब्धता करून देण्यात आल्या. देश आणि राज्यांतर्गत शेती यांत्रिक वापराकरिता आवश्‍यक असलेले हार्व्हेस्टरची सुविधा सुरू होती.या काळात कृषी विभागाने उचललेल्या महत्त्वपूर्ण पावलांमुळे रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पेरणीसारखी कामे सुरळीत पार पडली.’ 

‘‘याशिवाय शेतकऱ्यांना पिकांकरिता आवश्‍यक असलेल्या पतपुरवठ्यात पहिल्या कोविड लाटेच्या वेळेस केंद्र सरकारने अल्पमुदतीच्या कर्जाचे नूतनीकरणाची मुदत व्याज सवलतीसह वाढवून दिली होती. दुसऱ्या लाटेच्या वेळेस (वर्ष २०२१) या पद्धतीचा निर्णय घेण्यात  आला,’’ असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले.

लोकसभेतील लेखी उत्तरातील प्रश्‍न 

  • कोविड-१९च्या महामारी काळात शेतीवर आधारित कुटुंबांवर झालेल्या परिणामाचे केंद्र सरकारने मूल्यांकन केले आहे का? आणि असेल तर त्याची सविस्तर माहिती द्यावी.
  • कोविड संकटाच्या काळात शेती क्षेत्रातील कुटुंबांच्या डोक्यावरील सरासरी कर्जाचा भार वाढला आहे का? आणि असेल तर राज्यनिहाय त्याची माहिती सरकारने द्यावी.
  • राहुल गांधी यांनी विचारलेले मूळ प्रश्‍न : (संदर्भ : ट्विटर)

    1. आंदोलन काळात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक भरपाई मिळणार का?
    2. केंद्र सरकार ‘एमएसपी’वर (हमीभाव) विचार करत आहे का?
    3. कोविड काळात शेती क्षेत्रावर कोणता परिणाम झाला आहे?

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com