गोंदिया : पीक कर्ज वाटपात जिल्ह्याने आघाडी घेत राज्यात तिसरे स्थान राखले आहे. आत्तापर्यंत एकूण २२९० शेतकऱ्यांना दोनशे तीस कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यातही जिल्हा बँकेने सर्वाधिक १३७ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केल्याची माहिती सहकार खात्याच्या सूत्रांनी दिली. गतवर्षीच्या तुलनेत आत्तापर्यंत पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ८५.५१ टक्के या प्रमाणे साध्य झाले आहे.
खरीप हंगामासाठी आंतरमशागत तसेच निविष्ठांच्या खरेदी करता लागणाऱ्या पैशांची सोय म्हणून पीक कर्जाची उपलब्धता केली जाते. नाबार्ड आणि शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीयीकृत, ग्रामीण तसेच जिल्हा बँकांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट त्याकरिता निश्चित होते. यावर्षी या तीनही बँकांना खरीप हंगामात एकूण २३६ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी जिल्हा बँकेने १३७ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाची उद्दिष्टपूर्ती केली आहे. ग्रामीण बँकेने सुद्धा ८५ टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे. राष्ट्रीयीकृत बँका मात्र या वर्षीही पीक कर्जवाटप झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तिन्ही बँकांनी आत्तापर्यंत जिल्ह्यातील एकूण ४९ हजार २९० शेतकऱ्यांना २३० कोटी ८६ लाख ५३ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप केले.
त्यामुळेच यंदा जिल्हा पीक कर्ज वाटपात राज्यात तिसरा क्रमांक आहे. खरीप आणि रब्बी हंगामासाठी यावर्षी २७० कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. खरिपातच कोरोनाचा प्रादुर्भाव असतानासुद्धा २३१ कोटी रुपयांचे पीककर्ज शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया ३१ सप्टेंबर पर्यंत चालणार असून त्यामुळे पीक कर्ज वाटपाचा टक्काही वाढणार आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.