सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यात पावसाळ्यातही शेळ्या-मेंढ्या चारा-पाण्याच्या शोधात

शेळ्या-मेंढ्या
शेळ्या-मेंढ्या

सांगली ः जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी असते. या ही वर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे. तलाव विहिरी कोरडे आहेत. पिण्याच्या पाण्याला तंकर सुरू आहेत तर जीत्राबाच्या चाऱ्यासाठी छावणी सुरू आहे. पण मेंढ्या, शेळ्यांसाठी शासनांनी चाऱ्याची कोणतीही सोय केली नाही. पावसाळा सुरू झाला की, मेंढपाळ पुन्हा आपल्या गावाकडं आली आहेत. पाऊस होईल या आशेने गावात आणि परिसरात मेंढ्या चाऱ्यासाठी फिरवल्या जात आहेत. परंतु, पाऊस झाला नसल्याने रानावनात गवत उगवले नाही. झाडा-झुडपांना पालवीही फुटली नाही. त्यामुळे शेळ्या-मेंढ्या दिवसभर कुठे फिरवायच्या असा गंभीर प्रश्न पडला आहे. चारा काही वेळेस विकत घेता येईल पण जवळपास चाराच उपलब्ध होत नाही. रानात ओढ्या- नाल्याला पाण्याचा ठिपूस देखील नाही. दुष्काळी भागातील मेंढ्यांचे कळप दिवाळीनंतर चाऱ्याच्या शोधात गाव सोडून इतर भागात जातात. त्या भागात उसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते, पाऊस चांगला असतो. चाराही भरपूर प्रमाणात असतो त्यामुळे मेंढ्याची उपासमार होत नाही. हिवाळा व उन्हाळा असे दोन्ही ऋतूतील सात ते आठ महिने तेथेच काढतात. पावसाळ्यात नदीकाठच्या गावांना पाऊस भरपूर असतो त्यामुळे मेंढ्याची निगा राखता येत नाही ,तर गावाकडे कमी जास्त पावसाने चारा उपलब्ध होत असतो. म्हणून मेंढ्या घेऊन मेंढपाळ आपल्या गावाकडे येत असतो. पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले असल्याने गावाकडे आलेल्या मेंढ्यांना चारा चं उपलब्ध होत नाही. मोकळ्या रानात शेळ्या-मेंढ्यां फिरवाव्या लागतात पण सध्या रानावनात पाऊस पडला नसल्याने चारा  उपलब्ध नाही त्यामुळे शेळ्या-मेंढ्यांवर पुन्हा स्थलांतरांची वेळ आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com