सोलापूर : केंद्र शासनाच्या नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी तातडीने परिपत्रक काढले आहे. राज्यातील शेतकऱ्यांची माहिती २६ फेब्रुवारीपर्यंत अंतिम करून ती केंद्राच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
या योजनेमध्ये दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य तीन टप्प्यांमध्ये दिले जाणार आहे. यासाठीचा कालबद्ध कार्यक्रम राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन यांनी जाहीर केला आहे. यासाठी जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर समित्या स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
संवैधानिक पद धारण केलेल्या आजी-माजी व्यक्ती या योजनेसाठी अपात्र राहतील. त्याचबरोबर आजी-माजी खासदार, आमदार, मंत्री, महापालिकेचे महापौर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी, निमशासकीय संस्थेचे अधिकारी-कर्मचारी, चतुर्थश्रेणी कर्मचारी वगळून इतर सर्व कर्मचारी, मागील वर्षात आयकर भरलेली व्यक्ती, १० हजारांपेक्षा जास्त निवृत्तिवेतन असलेली व्यक्ती, नोंदणीकृत व्यावसायिक डॉक्टर, अभियंता, वकील, सीए, सनदी लेखापाल, वास्तुशास्त्रज्ञ या क्षेत्रातील व्यक्ती या योजनेसाठी अपात्र असतील. काम वेळेत होण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.