चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच नाही : बागायतदार नाराज

चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच नाही : बागायतदार नाराज
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच नाही : बागायतदार नाराज

नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या संत्रा उत्पादकांच्या समस्यांची गेल्या चार वर्षांत कोणतीच दखल सरकारकडून घेण्यात आली नाही. परिणामी, विदर्भातील संत्रा उत्पादकांमध्ये सरकारप्रती नाराजीचा सूर आहे.  अमरावती पाठोपाठ नागपूर, अकोला, वाशीम, यवतमाळ, बुलडाणा जिल्ह्यांत संत्रा लागवड क्षेत्र आहे. विदर्भातील संत्र्याखालील क्षेत्र दीड लाख हेक्‍टर इतके मोठे आहे. त्यातील ८५ ते ९० हजार हेक्‍टरवरील झाडे उत्पादनक्षम आहेत. या पिकाने विदर्भातील शेतीला आर्थिकस्थैर्य दिले असले तरी शासनाने मात्र संत्रा उत्पादकांना कोणत्याच प्रकारच्या सुविधा पुरविण्यासाठी पुढाकार घेतला नाही. परिणामी संत्रापट्‌ट्यात अनेक समस्यांनी थैमान घातले आहे.  सद्यःस्थितीत आंबिया बहारातील फुले आणि मुगाच्या दाण्याच्या आकाराची फळे आहेत. आंबिया बहारातील फळे टिकविण्यासाठी मे महिन्यापर्यंत पाण्याची गरज पडते. मे महिन्याला अद्याप चार महिने शिल्लक असल्याने बागा जगविण्याचे आवाहन शेतकऱ्यांसमोर आहे. दुष्काळीस्थिती लक्षात घेता १०० मायक्रॉनचे मल्‍चिंग अनुदानावर उपलब्ध करून देण्याची देखील शेतकऱ्यांची मागणी. दुष्काळाची घोषणा करण्यावरच सरकार समाधानी असून इतर कोणत्याच उपाययोजनांची अंमलबजावणी सरकारकडून केली गेली नाही, असा आरोप संत्रा उत्पादकांचा आहे. संत्रा बागायतदारांसाठी ९० टक्‍के अनुदानावर ठिबक दिल्यास त्यातूनही संत्रा बागायतदारांचे हित साधता येईल; परंतु विदर्भातील मुख्यमंत्री आणि सर्वच सत्ताकेंद्र असताना यातील एकाही बाबीकडे लक्ष दिले गेले नाही, असा आरोप आहे.  शेतकरी प्रतिक्रिया... सरकारला चार वर्षांचा कालावधी झाला. परंतु विदर्भातील मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडून संत्रा उत्पादकांचे प्रश्‍न जाणून घेण्यासाठी एकही बैठक बोलावण्यात आली नाही. महिनाभरापूर्वी संत्रा महोत्सवात अशी बैठक घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. परंतु, आता ते परत लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात दंग झाल्याने संत्रा उत्पादकांचा त्यांना विसर पडला. दुष्काळी उपाययोजनांच्या बाबतीतही संत्रा उत्पादकांसाठी दुजाभाव केला जात आहे. - मनोज जवंजाळ, संत्रा उत्पादक, काटोल, जि. नागपूर आंबिया फळांना मागणी आंबिया बहाराच्या फळांची चव आंबट गोड राहते. त्यामुळे केरळ, आंधप्रदेश, तमिळनाडू या भागांत मागणी अधिक राहते. मृगाच्या संत्र्याला नॉर्थ मध्ये मागणी राहते. ऑक्‍टोबर ते डिसेंबर या कालावधीत आंबियातील फळे उपलब्ध होतात.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com