महागाई, बेरोजगारीकडे सरकारचे दुर्लक्ष : शत्रुघ्न सिन्हा

महागाई, बेरोजगारीकडे सरकारचे दुर्लक्ष : शत्रुघ्न सिन्हा
महागाई, बेरोजगारीकडे सरकारचे दुर्लक्ष : शत्रुघ्न सिन्हा

सोलापूर  : ‘‘महागाई, बेरोजगारी आणि भूकबळी यांसारखे अनेक मोठे प्रश्‍न देशासमोर असताना मोदी सरकारकडून जम्मू-काश्‍मीरमधून ३७० कलम हटविल्याचा डांगोरा पिटला जात आहे. त्याचे भांडवल केले जात आहे. मात्र, मतदारांमध्ये मोठी शक्ती असल्याने तेच परिवर्तन घडवू शकतात,’’ असा विश्‍वास कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केला. 

सोलापूर शहर मध्यमधील कॉँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे, दक्षिण सोलापूर मतदारसंघातील उमेदवार बाबा मिस्त्री व शहर उत्तरमधील मनोहर सपाटे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, विश्‍वनाथ चाकोते, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी महापौर यू. एन. बेरिया, संजय हेमगड्डी, महापालिका गटनेते चेतन नरोटे उपस्थित होते.  

सिन्हा म्हणाले, ‘‘नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे देशाला मोठा आर्थिक फटका बसला. सरकारला बेरोजगारीचा प्रश्‍न विचारला, तर सरकार ३७० कलम हटविण्याचे सांगते. नोटाबंदी आणि जीएसटीसारखा चुकीचा निर्णय सरकारने घेतल्याने आज देशातील उद्योगधंदे देशोधडीला लागले आहेत. महागाईने उच्चांक गाठला आहे. जीएसटीमुळे चार्टर्ड अकाउंटंटचा फायदा झाला आहे. भाजप सरकारकडून मोठमोठ्या विकासाच्या गप्पा मारल्या जात असल्या तरी, भूकबळीमध्ये भारत जगात १०२ व्या स्थानी असल्याची आकडेवारी हंगर इंडेक्‍समधून नुकतीच समोर आली आहे.’’

‘‘पक्षापेक्षा देश मोठा असतो. देशापेक्षा कोणीही मोठा नसतो. मात्र व्यक्तिगत अहंकारापोटी असे निर्णय घेतले जात आहेत.’’ असे सिन्हा यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com