शेतकऱ्यांबाबत सरकार अजिबात गंभीर नाही ः राधाकृष्ण विखे

दूधउत्पादक शेतकरी रस्त्यावर येऊन आंदोलने करतात; पण सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. मंत्र्यांचेच दूधसंघ असल्याने, त्यांनीच सरकारची अनुदान दडपण्याचा प्रयत्न केल्याने शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडले नाही, असा आरोप माजी विरोधी पक्ष नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
Government is not serious about farmers: Radhakrishna Vikhe
Government is not serious about farmers: Radhakrishna Vikhe

नगर ः दूध उत्पादकांच्या प्रश्नांबाबत सरकार गंभीर नाही. राज्यात अतिवृष्टी झाली. शेतकरी पुन्हा संकटात सापडला, तरी सरकारची कोणतीही मदत नाही. दूधउत्पादक शेतकरी रस्त्यावर येऊन आंदोलने करतात; पण सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. मंत्र्यांचेच दूधसंघ असल्याने, त्यांनीच सरकारची अनुदान दडपण्याचा प्रयत्न केल्याने शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडले नाही, असा आरोप माजी विरोधी पक्ष नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.  

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर विखे पाटील पत्रकारांशी बोलत होते. अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा सत्य लपवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केली.

दूध उत्पादकांच्या प्रश्नांबाबत सरकार गंभीर नाही. राज्यात अतिवृष्टी झाली. शेतकरी पुन्हा संकटात सापडला, तरी सरकारची कोणतीही मदत नाही. दूधउत्पादक शेतकरी रस्त्यावर येऊन आंदोलने करतात; पण सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. मंत्र्यांचेच दूधसंघ असल्याने, त्यांनीच सरकारची अनुदान दडपण्याचा प्रयत्न केल्याने शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडले नाही. ग्राहकांना विक्री केल्या जाणाऱ्या दुधाचे दरही कमी झाले नाहीत, असे विखे पाटील म्हणाले.

कोविड संकटातही राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले नाही. कवडीमोल भावाने शेतमाल विकावा लागला किंवा फेकून द्यावा लागला. सरकार नावाची व्यवस्था कोणत्याच संकटात शेतकऱ्यांना आणि सामान्य माणसाला मदत करू शकली नाही, अशी टीका विखे पाटील यांनी केली. सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणाचा तपास ‘सीबीआय’कडे देण्याचा शहाणपणा राज्य सरकारने आधीच दाखवायला हवा होता; परंतु सरकारने जनतेचे लक्ष विचलित करून सत्य दडपण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआयने सुरू केला. त्यातून सत्य निश्‍चित समोर येईल, असा विश्वास व्यक्त करुन विखे पाटील म्हणाले, ‘‘राज्य सरकारकडे निर्णय घेण्याबाबत कोणतेच धोरण नाही. शाळा उघडण्यापासून ते महाविद्यालयांच्या परीक्षा घ्यायच्या की नाही, याबाबत सरकारची स्वतःची भूमिका नाही. सरकार गोंधळलेल्या अवस्थेत काम करीत आहे. समाजहिताचे कोणतेच निर्णय सरकार घेऊ शकत नाही.’’ असा आरोप विखे पाटील यांनी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com