राज्यातील शेतकऱ्यांना दरमहा पेन्शन देण्याची योजना : चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

विटा, जि. सांगली : पगारदार नोकरांप्रमाणे आता राज्यातील शेतकऱ्यांना दरमहा पेन्शन देण्याची योजना आम्ही आणली आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

विटा येथे बळिराजा कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्‌घाटन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ४) झाले. त्या वेळी ते बोलत होते.  या वेळी श्री. पाटील म्हणाले, की उसाच्या एफआरपीसाठी राज्य सरकारने २४०० कोटी रुपयांचे कर्ज कारखान्यांना दिले आहे. एका जरी कारखान्याने एफआरपी दिली नाही, तर त्याविरुद्ध कारवाई करणार आहोत. कारण आम्ही साखरेची किंमत २९ रुपये प्रति किलो निर्धारित केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांसाठी मोठी कामे करत आहेत. निधीअभावी अर्धवट राहिलेल्या कामांसाठी केंद्राने साडेचार वर्षांत चोवीस हजार कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे टेंभू, उरमोडी योजनांसारखी कामे सुरू झाली. ८७ लाख शेतकऱ्यांनी पीकविमा घेतला. दोन हजार नऊशे कोटी रुपयांची विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळाल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. 

टेंभू योजनेवर टीका करणारे लोक आता टेंभूच्या पाण्यावर शेती करत आहेत. चार वर्षे गायब असलेली मंडळी आता चंद्रकांतदादा तुमच्यासमोर येतील, असा टोला माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे नाव घेता जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी लगावला. 

या वेळी आमदार अनिल बाबर यांनी मार्गदर्शन केले. विजय पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, पृथ्वीराज देशमुख, संग्रामसिंह देशमुख, शोभाताई बाबर, सोनिया बाबर, नगरसेवक अमोल बाबर, प्रतापशेठ साळुंखे, मनीषा बागल, संजय विभुते, तानाजी पाटील, विनोद गुळवणी उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com