नवी दिल्ली : केंद्र सरकारने २०१८-१९ च्या रब्बी हंगामासाठी गव्हासह काही पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्याचा निर्णय बुधवारी (ता.३) घेतला.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या या निर्णयानुसार गव्हाची किमान आधारभूत किंमत प्रतिक्विंटल १०५ रुपयांनी वाढवून ती १८४० रुपये क्विंटल करण्यात आली आहे. केंद्राने गेल्या वर्षी गव्हासाठी प्रतिक्विंटल १७३५ रुपये एमएसपी जाहीर केली होती. आजच्या निर्णयानुसार त्यात १०५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. कृषी सल्लागार समितीने (सीएसीपी) याबाबतची शिफारस केली होती.
पिकाच्या उत्पादन खर्चाच्या ५० टक्के जास्त भाव शेतकऱ्याला देण्याचे सरकारचे आश्वासन आहे. नव्या एमएसपी वाढीमुळे शेतकऱ्यांना ६३ हजार ६३५ कोटी रुपयांचा फायदा होईल व उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा होईल असे केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह व रविशंकर प्रसाद यांनी पत्रकारांना सांगितले.
मसूर, हरभऱ्यातही वाढ अन्य काही पिकांसाठीही प्रति क्विंटल एमएसपीमध्ये वाढ करण्यात आली. ती अशी ः मसूर-२२५ रुपये, करडई-२४५ रुपये आणि हरभरा-२२० रुपये. या वाढीमुळे या तिन्ही पिकांसाठी शेतकऱ्यांना अनुक्रमे ४२७५ रुपये, ४९४५ रुपये व ४६२० रुपये असा प्रतिक्विंटल भाव मिळेल. याशिवाय जवसाची एमएसपी क्विंटलमागे ३० रुपयांनी वाढवून १४४० रुपये करण्यात आली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.