शासनाने शेतीमाल बांधावर खरेदी करावा : शेतकरी संघटना

लातूर : ‘कोरोना’ विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्यात २१ दिवसांच्या लॉकडाऊन नंतर खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा १६ दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या लॉकडाऊनच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न निर्माण होऊन ‘कोरोना’चा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर व्यवसायाबरोबर बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. बाजार समित्या बंद करणार असाल तर शासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीमाल खरेदी करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापूरे यांनी केली आहे.
The government should buy agricultural produce on the dam
The government should buy agricultural produce on the dam

लातूर : ‘कोरोना’ विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्यात २१ दिवसांच्या लॉकडाऊन नंतर खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा १६ दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या लॉकडाऊनच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न निर्माण होऊन ‘कोरोना’चा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर व्यवसायाबरोबर बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. बाजार समित्या बंद करणार असाल तर शासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीमाल खरेदी करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापूरे यांनी केली आहे.

बाजार समित्या बंद झाल्यामुळे राज्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. एका बाजूला जागतिक स्तरावर लॉकडाऊन असल्यामुळे निर्यात बंद आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्यात होणारा शेतीमाल थांबला आहे. त्यामुळे होलसेल खरेदी करणारा व्यापारी पुढे येत नाही तर, दुसऱ्या बाजूला देशाअंतर्गत बाजार समित्या बंद आहेत. यामुळे दोन्ही बाजूंनी शेतकरी कोंडीत सापडला आहे. प्रशासनाकडून सांगितले जात आहे की, शेतकऱ्यांना कोणत्याही शेतीमालाची वाहतूक किंवा विक्री करायची असेल तर त्यासाठीचा परवाना जिल्हा प्रशासनाकडून दिला जाईल. पण आज गल्लीबोळात व सोसायटीत जाऊन शेतीमाल विक्री करणे सर्व शेतकऱ्यांना शक्य आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

शासकीय खरेदी केंद्र, ग्रामपंचायत, सोसायट्या अशा कोणाच्याही मार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सरसकट शेतीमाल खरेदी करून तो माल गाव, शहर, महानगर, वॉर्ड, सोसायटीत, विक्री करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

...तर लाखोंचा फटका बसेल द्राक्षे, आंबे, कलिंगड, खरबूज आदी फळे हे दरवर्षी मोठ्या प्रमाणात निर्यात होतात. हा माल गल्लीगल्लीत जाऊन अर्धा एक किलोने विक्री करणे शक्य नाही. फळे भाजीपाला वेळेत तोडणी करून विक्री केले तर ठीक अन्यथा शेतात सडून जातो. याकरिता शासनाने काही तरी निर्णय घेतला पाहिजे. शेतकऱ्यांनी यासाठी लाखो रुपये लावले आहेत. ते जर विक्रीमधून निघाले नाहीत तर शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडतील.

‘शेतकऱ्यांना मदत करा’ राष्ट्रीय आपत्ती जाहीर झाली असल्याने केंद्र व राज्य सरकारनेही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. शेतकरी वाचला तर देश वाचणार आहे. अन्यथा लॉकडाऊन नंतर देशाला आर्थिक मंदीला सामोरे जावे लागणार आहे. त्या आर्थिक मंदीतून देशाला फक्त शेतकरीच बाहेर काढू शकतो. म्हणून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com