खेडे मजबूत करण्यासाठी सरकार काम करतेय

खेडे मजबूत करण्यासाठी सरकार काम करतेय
खेडे मजबूत करण्यासाठी सरकार काम करतेय

नगर : ग्रामीण भागाचा विकास हे राज्याचे भूषण आहे. त्यामुळे खेडे मजबूत करण्यासाठी सरकार काम करतेय. सरकारी निधीचा भरघोस पाऊस पाडू, गावे सशक्त करू. त्यामुळे गावविकासाचा निश्चय करून काम करावे. सरपंचांना पदासोबत सन्मान देण्यासाठी सरकार काम करत आहे, असे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. 

शिर्डी येथे आज (बुधवारी) राज्याच्या ग्रामविकास विभाग व अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी एकदिवसीय कार्यशाळा झाली. ग्रामविकासमंत्री मुंडे यांच्या हस्ते पहिल्या सत्रात कार्यशाळेला प्रारंभ झाला. 

या वेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, पंचायतराज समितीचे अध्यक्ष सुधीर पारवे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील कुर्डूकर यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. 

मुंडे म्हणाल्या, ‘‘ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायती सक्षम करण्यासाठी नियोजन केले आहे. त्यामुळे वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीला दिला आहे. गांधीजींच्या विचारांनुसार खेड्याकडे चला सांगून राज्य सक्षम करत आहोत. राज्यातील आदर्श झालेल्या ग्रामपंचायतीला मी भेट देत आहे. सरपंचाला ताकद दिली तर विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे चांगले सुशिक्षित तरुण सरपंच निवडले जावेत, यासाठी थेट सरपंच जनतेतून निवडण्याचा निर्णय घेतला. सरपंच हाच ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा आहे. सरपंचांना पदासोबत सन्मान देण्याचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून सरपंचाच्या मानधनात वाढ केली असून आता एक हजार रुपयांएेवजी ३०००, ४००० व पाच हजार रुपये मानधन केले आहे. ’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com