नवी दिल्ली ः केंद्र सरकारकडून पुढील काही दिवसांत बफर स्टॉकमधील सात लाख टन कडधान्यांची विक्री केली जाण्याची शक्यता अाहे.
सात लाख कडधान्यांपैकी साडेतीन लाख टन कडधान्ये गुजरात, कर्नाटक अाणि तमिळनाडू अादी राज्यांना अाणि उर्वरित साडेतीन लाख कडधान्ये साठा खुल्या बाजार योजनेअंतर्गत विकला जाणार अाहे, अशी माहिती केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी दिली अाहे.
सध्या देशात १.८ दशलक्ष टन कडधान्यांचा बफर स्टॉक पडून अाहे. बफर स्टॉकमधील कडधान्ये पुरवठा करण्याची मागणी तीन राज्यांनी केंद्राकडे केली अाहे. त्यानुसार त्यांना कडधान्ये पुरवठा केला जाणार अाहे. याबाबत येत्या एक-दोन दिवसांत निर्णय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले अाहे.
देशात २०१६-१७ मध्ये विक्रमी २२.९५ दशलक्ष टन कडधान्ये उत्पादन झाल्याचा अंदाज अाहे. बंपर उत्पादनानंतर केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे हीत लक्षात घेत २ दशलक्ष टन कडधान्यांचा बफर स्टॉक केला होता. कडधान्यांचा हा साठा खराब होऊ नये यासाठी त्यासाठी तो अाता विकण्यासाठी हालचाली सुरू अाहेत.