शेतकऱ्यांना मदतीसाठी कर्जाशिवाय गत्यंतर नाही: शरद पवार

स्थानिक लोकांशी बोलल्यावर आणि प्रत्यक्षात पाहिल्यावर महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी असे आस्मानी संकट आले नव्हते.
sharad pawar
sharad pawar

तुळजापूर, जि. उस्मानाबाद: स्थानिक लोकांशी बोलल्यावर आणि प्रत्यक्षात पाहिल्यावर महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी असे आस्मानी संकट आले नव्हते. त्यामुळे या संकटातून लोकांना बाहेर काढण्यासाठी कर्ज काढण्याशिवाय गत्यंतर नाही. मुख्यमंत्र्यांशी बोलून कर्ज काढण्याची विनंती करणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिली.  रविवार आणि सोमवार अतिवृष्टी झालेल्या मराठवाड्यातील गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली.  त्यानंतर शरद पवार यांनी रविवारी (ता.१९) सकाळी तुळजापूर सर्कीट हाऊसवर पत्रकार परिषद घेतली. ‘‘पीकविम्याचे जे निकष आहेत ते शिथिल करून मदत देण्यात यावी. पुरात सोयाबीन वाहून गेली आहे त्याचे पंचनामे करता येणार नाहीत, 

त्यामुळे ज्यांचे सोयाबीन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांनासुद्धा नुकसान भरपाई देण्यासाठी नियमात तरतूद करण्यात यावी. त्या नियमात फेरविचार करण्याची मागणी करावी लागणार आहे. जमिनीची धूप झाली आहे. पाझर तलाव, व रस्त्यांचे नुकसान झाले आहे. या सगळ्यांसाठी जिल्हा नियोजनाचा निधी पुरेसा ठरणार नाही. त्यामुळे याला स्वतंत्र मदत देण्याचा निर्णय राज्य व केंद्र सरकारने घ्यावा,’’ अशी मागणी करणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.  श्री. पवार म्हणाले, की उस्मानाबाद, लातूर, नांदेड, सोलापूर जिल्ह्याचा, पंढरपूर परिसराचा भाग या ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालेलं आहे. पुणे जिल्ह्याच्या इंदापूर भागात असंच चित्र आहे. उस्मानाबाद हा सबंध जिल्हाच संकटात असल्याचं दिसत आहे.

‘‘शरद पवार यांनी पाहणी केल्यानंतर सांगितले की, सोयाबीनचे पीक अतिवृष्टीमुळे कुजले, वाहून गेलंय किंवा उद्ध्वस्त झालंय. अतिवृष्टीचा परिणाम उसाच्या पिकावरही झाला आहे. या जिल्ह्यातली कारखानदारी जर लवकर सुरू झाली तर कदाचित काही उसाचा गळितासाठी विल्हेवाट लावण्यासाठी शक्य होणार आहे. म्हणून राज्य सरकारच्या सहकार खात्याशी कारखानदारी लवकर सुरू करता येईल का? याबाबत विचारणा करणार आहे,’’ असे शरद पवार यांनी सांगितले. 

शरद पवार म्हणाले...

  • जमीनच उद्ध्वस्त झाल्याने उभं राहणं सोपं 
  • शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदतीची गरज 
  • इंजिनं आणि पाइपलाइन्सही वाहून गेल्या
  • गावपातळीवरील रस्त्यांसाठी गुंतवणुकीची गरज 
  • विम्यासाठी ७२ तासांत नुकसानीचा फोटो अपलोड करणे सोप नाही. 
  • अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विमा नियमात शिथिलता देण्याची मागणी करणार 
  • लगेच मदत शक्य होत नाही, त्याची एक पध्दत असते
  • चौकटीच्या बाहेर पाऊस टाकल्याशिवाय लोकांना संकटातून बाहेर काढू शकत नाही.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com