ग्रामपंचायत सुधारणा विधेयक सादर

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहातील गोंधळात ग्रामपंचायत सुधारणा विधेयक सादर करण्यात झाले. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेत विधेयकाला विरोध दर्शविला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुद्धा फडणवीस यांचे आक्षेप खोडून काढत प्रत्युत्तर दिले. अखेर विरोधकांनी बहिष्कार टाकत सभात्याग केला.
Gram Panchayat Reform Bill introduced
Gram Panchayat Reform Bill introduced

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहातील गोंधळात ग्रामपंचायत सुधारणा विधेयक सादर करण्यात झाले. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेत विधेयकाला विरोध दर्शविला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुद्धा फडणवीस यांचे आक्षेप खोडून काढत प्रत्युत्तर दिले. अखेर विरोधकांनी बहिष्कार टाकत सभात्याग केला.

पुरवणी मागण्या आणि काही महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन बोलावण्यात आले आहे. सुरुवातीला पाच वर्षे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक नेमण्यासंदर्भात राज्य सरकारने आणलेले ग्रामपंचायत सुधारणा विधेयक मांडण्यास विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी परवानगी दिली.

त्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी हे विधेयक मांडले. ग्रामपंचायत व्यवस्था उद्ध्वस्त होता कामा नये. तसेच एकेका व्यक्तीला ७-८ ग्रामपंचायतींचा कार्यभार सांभाळता येणार नसल्याने विधेयक मांडण्यात येत असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. या ग्रामपंचायत‌ सुधारणा विधेयकाला विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी आक्षेप घेतला. मात्र, विधेयकाचा प्रस्ताव बहुमताने विधानसभेत संमत करण्यात आला. विरोधकांची मागणी अमान्य झाल्याने फडणवीस यांच्यासह विरोधकांनी सभात्याग केला.

मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला दरम्यान, शोकप्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी प्रणव मुखर्जी यांच्या आठवणींना उजाळा देत भाजपला चिमटे काढले. जेव्हा राष्ट्रपतीपदाची निवडणूक होती तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी प्रणव मुखर्जी यांना उघड पाठिंबा दिला. त्यावेळी ते शरद पवार यांच्याबरोबर मातोश्रीवर आले होते. एकदा ते मुंबईत आले तेव्हा त्यांच्याकडून बोलावणे आले. भेटल्यावर त्यांनी महापालिका निवडणुकीतील विजयासाठी अभिनंदन केले. ते म्हणाले मला वाटले नव्हते मी राष्ट्रपती होईन, शिवसेनाप्रमुख यांच्यामुळे मी राष्ट्रपती झालो. हे ऋण व्यक्त करण्यासाठी मी तुला भेटत आहे, असे त्यांनी सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. नाहीतर काहीजण रात गयी बात गयी, खुर्ची मिळाली की विचार करत नाहीत अशा शब्दात त्यांनी भाजपला टोला लगावला. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर, माजी राज्यमंत्री अनिल राठोड, सदस्य हरिभाऊ जावळे यांना सभागृहात आदरांजली वाहण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com