सांगली जिल्ह्यात पाण्याअभावी द्राक्षबागेवर कुऱ्हाड

द्राक्ष बाग
द्राक्ष बाग

सांगली ः पावसाळा संपत आला तरी तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात समाधानकारक पाऊस झाला नाही. बंद सिंचन योजनांमुळे शेतकऱ्यांच्या विहिरी, बोअरची पाणीपातळी घटली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाण्याअभावी या भागातील द्राक्ष बागेवर शेतकऱ्यांनी कुऱ्हाड चालवली आहे. तासगाव तालुका द्राक्ष उत्पादनासाठी अग्रेसर आहे. सुरवातीच्या काळात अत्यल्प क्षेत्र होते. परंतु त्यानंतर या भागातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाऐवजी द्राक्ष पीक घेऊ लागले. उपलब्ध भांडवल, कर्ज घेऊन, बोअर, विहिरी असे स्रोत निर्माण करून शेतकरी द्राक्ष शेतीकडे वळले. द्राक्षबागा लागवडीचा खर्च अधिक असला तरी ठोक उत्पन्न देणारे पीक असल्याने भागात द्राक्ष क्षेत्र गतीने वाढले.  सावळज पूर्व भागात दुष्काळी स्थितीमुळे भीषण पाणीटंचाई आहे. गतवर्षी आणि यंदा तालुक्याच्या पूर्व भागात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे द्राक्ष शेती धोक्यात आली आहे. पूर्व भागात शेती व पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. नागरिक व जनावरांना प्यायला पाणी नाही. यंदा द्राक्ष हंगामाच्या सुरवातीपासूनच टॅंकरने पाणी घालून द्राक्ष बागा जगविण्याची धडपड करत होते.  पूर्व भागात सलग तीन वर्षांपासून निर्सगाची अवकृपा राहिली. द्राक्ष पीक शेतकऱ्यांपुढे पाण्याचे आव्हान राहिले. २०१६, २०१७, २०१८ या तीन वर्षांत पाऊस कमी झाल्याने भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली. एकरी एक ते दोन लाख गुंतवणुकीच्या द्राक्षपिकावर अस्मानी संकट कोसळले. पावसाचा अभाव व बंद सिंचन योजनांमुळे शेतकऱ्यांच्या विहिरी, बोअरची पाणी घटले. काही कोरड्या पडल्या. पाण्याअभावी यंदाच्या सप्टेंबरला छाटण्या लांबणीवर पडत आहेत. हंगाम प्रारंभीच पाणी कमी पडू लागल्याने शेतकरी बागांवर कुऱ्हाड चालवत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com