द्राक्षबागेतील वातावरणाचा आढावा घेतल्यास बऱ्याच ठिकाणी दिवसाचे तापमान वाढलेले दिसून येईल. ज्या ठिकाणी बागेत लवकर छाटणी झाली, तिथे फुटींची वाढ जोमात होताना दिसून येईल. काही ठिकाणी नवीन फुटी निघण्याकरिता अडचणी येताना दिसून येतील. काही बागांमध्ये निघालेल्या कोवळ्या फुटीवर स्कॉर्चिंग आलेले दिसेल. या तिन्ही समस्यांवर पुढील उपाययोजना उपयुक्त ठरतील. वेळीच छाटणी झालेल्या बागेमध्ये फुटीची विरळणी महत्त्वाची असेल. सर्वच फुटी व्यवस्थित फुटल्या असल्यास एका वेलीवर साधारणपणे ८० ते ९० फुटी दिसतील. यामध्ये जवळपास १० टक्के फुटी जोमदार दिसतील, अन्य १० टक्के फुटी अशक्त व उशिरा निघालेल्या असतील. उर्वरीत ८० टक्के फुटी एकसारख्या व एकाच वेळी निघालेल्या दिसतील. फुटीची विरळणी करताना महत्त्वाचे म्हणजे वेलीला मिळालेल्या प्रत्येक वर्गफूट अंतराकरिता अर्धी काडी किंवा फूट असे गुणोत्तर असावे. ओलांड्यावर प्रत्येक काडी अडिच ते तीन इंच अंतरावर असल्यास पुढील नियोजन सोपे होते. उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होते. तेव्हा उपलब्ध ८० टक्के फुटींपैकी अडिच ते तीन इंचावर काडी राहिल अशा प्रकारे विरळणी करून घ्यावी. इतर दोन वर्गातील काड्या (जोमदार व अशक्त) सरसकट काढून टाकाव्यात. या फुटींची विरळणी शक्यतो सहा ते सात पानांच्या अवस्थेत केल्यास एकतर परिणाम चांगले मिळतात. व काड्या ओळखणे सोपे होते.
डोळे फुटण्याची समस्या काही बागांमध्ये डोळे फुटण्याची समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. खालील परिस्थितीतील बागेत डोळे फुटण्याची समस्या प्राधान्याने दिसून येते. उशिरा फळकाढणी केलेली बाग या बागेत वेलीवर फळ दिर्घकाळ राहिल्यामुळे वेलीस ताण जास्त बसला. त्यामुळे फुटी निघणे कठिण होत आहे. मागील हंगामात वेलीवर जास्त प्रमाणात घडांची संख्या होती या परिस्थितीमुळे वेलीमधील आवश्यक सोर्स ः सिंक गुणोत्तर बिघडले, परिणामी वेल ताण सहन करू शकली नाही. द्राक्षबागेत फळ काढणी ते खरड छाटणी या कालावधीमध्ये अपूर्ण विश्रांती बऱ्याचशा बागेत मजूरांची उपलब्धता नसल्यामुळे फळकाढणी लवकर झाली नाही. आता खरटछाटणीला उशीर होत असल्यामुळे पुन्हा खरड छाटणी लवकर घेतली. अशामुळे त्याचाही ताण वेलीवर आला. खरडछाटणीपूर्वी घेतलेली चारी जास्त काळ उघडी राहिली असल्यास बऱ्याच वेळा आपण खरड छाटणीपूर्वी मशागत म्हणून दोन वेलीमध्ये उपलब्ध बोद खोदून मोकळे करतो. त्यामध्ये पुन्हा शेणखत व अन्य अन्नद्रव्याचा पुरवठा करून माती झाकून पुन्हा बोद तयार करतो. असे करतेवेळी खोदलेले बोद काही दिवस उघडे राहतात. जवळपास २५ ते ३० टक्के मुळेसुद्धा तुटली जातात. उन्हाच्या तीव्रतेमुळे पेशींची मर होते. त्याचाच परिणाम म्हणजे ओलांडे जास्त प्रमाणात कडक झालेले असतात. कारण या वेलीमध्ये रसनिर्मिती कमी झालेली असते. परिणामी डोळे एकतर उशीरा फुटतात किंवा फुटतच नाहीत. अशा परिस्थितीत ओलांडे डागाळलेले दिसतील किंवा मुके झालेले दिसतील. या परिस्थितीमध्ये करावयाच्या उपाययोजना
कोवळ्या फुटीवर स्कॉर्चिंग काही बागांमध्ये निघालेल्या कोवळ्या फुटीवर स्कॉर्चिंग आलेले दिसेल. बऱ्याचशा बागेत पानांच्या कडा जळालेल्या दिसतील किंवा काही परिस्थितीत पानांच्या वाट्यासुद्धा झालेल्या दिसतील. जुनी बाग खरट छाटणी होऊन निघालेल्या फुटीवर अशी काही परिस्थिती दिसून येईल. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर बऱ्याच बागेत निघालेल्या कोवळ्या फुटींवर उन्हाच्या वेळी बुरशीनाशकांची फवारणी घेतली गेल्याचे दिसून आले. यामुळे पानाच्या कडा जळालेल्या दिसतील. जरी शिफारशीत बुरशीनाशकाचा योग्य डोस घेतला असला तरी पानामध्ये पूर्णपणे हरितद्रव्य तयार झालेले नसल्यामुळे वापरलेले प्रमाण जास्त झाले. परिणामी स्कॉर्चिंग आले. खरेतर बागेत या तापमानात कोणताही रोग येण्याची शक्यता कमी असते. तेव्हा बुरशीनाशकांची फवारणी आपल्याला टाळता येते. अगदीच फवारणी करायची झाल्यास सकाळी किंवा संध्याकाळी करावी. नवीन बाग
संपर्क- डॉ. आर . जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८ (संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.