गेल्या चार दिवसापासून लागवडीखाली विभागामध्ये जास्त प्रमाणात पाऊस झाला. या पूर्वीही आठवड्यापूर्वी असाच पाऊस अनुभवास आला. या पावसामुळे द्राक्षबागेत रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढला असून, त्याचा परिणाम पानगळीमध्ये झाल्याचे दिसते. गेल्या चार दिवसापासून लागवडीखाली विभागामध्ये जास्त प्रमाणात पाऊस झाला. या पूर्वीही आठवड्यापूर्वी असाच पाऊस अनुभवास आला. या पावसामुळे द्राक्षबागेत रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढला असून, त्याचा परिणाम पानगळीमध्ये झाल्याचे दिसते. त्यानंतरच्या काळात थोडीफार उघडीप मिळाली व बागायतदारांनी विविध बुरशीनाशकांच्या फवारण्या करून रोग नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. रोग नियंत्रण होत आहे, ही परिस्थिती होण्यापूर्वीच पुन्हा जास्त प्रमाणात पाऊस झाला व पुन्हा द्राक्षबागेमध्ये तीच समस्या उद्भवत असल्याचे दिसून येते. यामध्ये काडीची परिपक्वता व रोगामुळे होणारी पानगळ या समस्या दिसून येतात. काडीची परिपक्वता सतत व जास्त प्रमाणात झालेला पाऊस, वातावरणातील आर्द्रता वाढवून वेलीमध्ये जिबरेलीन्सचे प्रमाण जास्त वाढून वेलीच्या जोम जास्त वाढतो. यामुळे फुटींची व पानांची गर्दी जास्त प्रमाणात होते. फक्त पाऊसच नाही, तर ढगाळ वातावरण जास्त काळ राहिल्यामुळे वेलीच्या काडीवर आवश्यक तो सूर्यप्रकाश मिळालेला नाही. त्यामुळेच काडीची परिपक्वता अपेक्षित कालावधीत पूर्ण झाली नाही. फळछाटणीचा कालावधी जवळ येत असूनही काडीची परिपक्वता बऱ्याच ठिकाणी सबकेनच्या मागे किंवा काही ठिकाणी सहा ते सात डोळ्यापर्यंत दिसून येईल. ही परिपक्वता फळछाटणीच्या दृष्टीने पुरेशी नाही. काही ठिकाणी काडी बाहेरून पूर्णपणे परिपक्व झालेली दिसत आहे. मात्र, त्या वेलीवर पाने कमी असल्यास अशा काड्यांची तपासणी सूक्ष्मदर्शकाखाली तपासाव्यात. त्यामध्ये घड कच्चा दिसत असेल. त्या काडीचा काप (सबकेनच्या तीन डोळ्यापुढे) घेतल्या नंतर त्या काडीमधील पीथ पूर्णपणे तपकिरी रंगाचा दिसत नाही. अशा काडीवर फळछाटणी घेतल्यास एकतर घड लहान असतील किंवा गोळी घडामध्ये रुपांतरीत होण्याची शक्यता असेल. तेव्हा अशा बागांमध्ये खालील उपाययोजना महत्त्वाच्या असतील.
रोगामुळे होणारी पानगळ बऱ्याचशा बागेमध्ये भुरी आणि डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. या रोगांचे बिजाणू पानांमधून व देठामधून रस शोषून घेतात. त्यानंतर पान अशक्त होऊन गळून पडते. काडीमध्ये प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून अन्नद्रव्ये तयार करून, त्या काडीमध्ये पुढील हंगामात घडाच्या विकासासाठी आवश्यक तो अन्नसाठा तयार करण्यामध्ये पानांचा फार मोठा सहभाग असतो. बऱ्याचशा बागेत रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानगळ झाल्यामुळे काडीमध्ये अन्नद्रव्यांचा साठा आवश्यकतेइतका नाही. बऱ्याच ठिकाणी १० ते ६० टक्के पानगळ झाली असल्याचे दिसून येते. पाने गळून पडल्यानंतर काडीमध्ये अन्नद्रव्ये तयार करण्याकरिता अडचणी येतात. ज्या बागेत जास्त प्रमाणात पानगळ झाली व काडीची परिपक्वता झालेली नाही, अशा ठिकाणी मागील डोळे फळछाटणीपूर्वीच फुटण्याची समस्या दिसून येईल. बऱ्याचशा बागेमध्ये या वेळी छाटणी घेऊनही उपयोग होणार नाही. अशा स्थितीत पुढील उपाययोजना महत्त्वाच्या आहेत.
संपर्क- डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८ ( राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.