द्राक्ष आगारावर गारपिटीचा आघात 

जिल्ह्यातील कडवंची परिसरातील नाव्हा, वरुड, धारकल्याण, कडवंची, नंदापूर आदी गावशिवारातील अनेक द्राक्ष बागांना बुधवारी (ता २४) रात्री गारपिटीचा तडाखा बसला.
kadwanchi damage
kadwanchi damage

जालना : जिल्ह्यातील कडवंची परिसरातील नाव्हा, वरुड, धारकल्याण, कडवंची, नंदापूर आदी गावशिवारातील अनेक द्राक्ष बागांना बुधवारी (ता २४) रात्री गारपिटीचा तडाखा बसला. उत्पादन हाती येणाऱ्या बागांतील पीक काही क्षणांतच गारपिटीने होत्याचे नव्हते केल्याची माहिती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी दिली. 

कडवंची, धारकल्याण, वरुड, नाव्हा, नंदापूर, अंभोरेवाडी, वखारी आदी जवळपास दहा ते पंधरा गावांत सुमारे ५००० एकरांवर द्राक्ष बागा क्षेत्र विस्तारले आहे. यंदाचा हंगाम द्राक्ष हंगाम सातत्याने प्रतिकूल परिस्थिती सह संकटाची मालिका घेऊन आला. आधी बागा न फुटल्याने आधीच द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यात आता उत्पादनक्षम असलेल्या बागांवर गारपिटीचा आघात झाल्याने द्राक्ष उत्पादकांची कंबरडे मोडले आहे. बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास काही वेळ झालेल्या गारपिटीने द्राक्षाचे घड जमिनीवर पाडले. तर वेलींना असलेल्या घडातील द्राक्षमणी मोठ्या प्रमाणात दुखापतग्रस्त केले. याशिवाय गारपीट पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे काही द्राक्ष बागांचे आधारवडही कोसळले.  वरुड शिवारात द्राक्ष पिकाबरोबरच हरभरा, गहू या काढणीला आलेल्या रब्बी पिकांसह भाजीपाला, कांदा आदी पिकांचे ही मोठे नुकसान झाल्याची माहिती शेतकरी व कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. तालुका कृषी अधिकारी संतोष गाडे यांच्यासह कडवंची, वरुड आदी गावचे कृषी सहायक, तलाठी प्रशासकीय यंत्रणेचे घटक गुरुवारी (ता २५) सकाळीच प्रत्यक्ष पाहणी साठी वरुड, धारकल्याण, नंदापूर, कडवंची, नाव्हा आदी परिसरांत फिरत होते. प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचा प्राथमिक अंदाज वरिष्ठ प्रशासनाला कळविला जाणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संतोष गाडे यांनी दिली. विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा तत्काळ लाभ मिळण्याची मागणी शेतकरी वर्गामधून होत आहे.  प्रतिक्रिया जवळपास तीन एकरातील काढणीला आलेल्या द्राक्ष बागेला गारपिटीचा तडाखा बसला. केवळ माझ्याच नव्हे तर गावशिवारातील अनेक बागांचे गारपिटीने मोठे नुकसान केले.  - सोपान क्षीरसागर, द्राक्ष उत्पादक, कडवंची  जवळपास अडीच एकरांतील द्राक्ष बागेतून किमान ३०० क्विंटल द्राक्ष उत्पादन होणे अपेक्षित होते. बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास काही क्षणांत गारपिटीने माझ्या बागेतील द्राक्षांचा जमिनीवर सडा केला. जे द्राक्षमणी घडाला उरले तेही फुटले आहेत. नुकसान झालेल्या क्षेत्रापैकी सव्वा एकराचा विमा उतरवू शकलो, तर सव्वा एकर क्षेत्र बिना विम्याचे आहे. काही कळायच्या आत मोठे नुकसान झाले.  - बाबूराव अंभोरे, अंभोरेवाडी, जि. जालना 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com