औरंगाबाद : यंदा रब्बीची पेरणी १९ लाख ६१ हजार २०६ हेक्टरवर पेरणी उरकली आहे. त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त क्षेत्र हरभऱ्याने व्यापले आहे. शेतकऱ्यांनी हरभऱ्यालाच प्रथम पसंती दिल्याचे चित्र आहे. मागे पुढे झालेल्या पेरणीमुळे कुठे उगवणी, वाढीच्या, तर कुठे शाखीय वाढीच्या अवस्थेत हे पीक असल्याचे चित्र आहे.
यंदा मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत यंदा रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १९ लाख १९ हजार ५१६ हेक्टर होते. त्या तुलनेत प्रत्यक्षात १९ लाख ६१ हजार २०६ हेक्टरवर पेरणी झाली. त्यापैकी ९ लाख ८७ हजार ७२२ हेक्टरवर हरभरा आहे. पेरणी क्षेत्रामध्ये औरंगाबाद जिल्हा वगळता उर्वरित आठही जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन पेरणी झाली आहे.
लातूर जिल्ह्यात हरभऱ्याची सर्वाधिक पेरणी झाली. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत अडीच पट क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. उस्मानाबाद, बीड, जिल्ह्यांत जवळपास दुप्पट, लातूर व नांदेडमध्ये सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा अडीच पटीच्या पुढे, हिंगोली, जालना जिल्ह्यांत सव्वा ते दीडपट, तर औरंगाबाद जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९१ टक्के क्षेत्रावर शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी केली आहे.
अवेळी पावसामुळे वापसा स्थिती येण्यास व त्यानंतर जमीन तयार करण्यास उशीर झाला. त्याचा थेट परिणाम रब्बीच्या पेरणीवर झाला. ती टप्प्याटप्प्याने व विलंबाने होत आहे. काही पिकांचा पेरणीचा कालावधी निघून गेला. तरीही शेतकरी त्याची पेरणी करण्याला प्राधान्य देत असल्याने अजूनही अनेक भागांत रब्बी पेरण्या होत असल्याचे चित्र आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.