कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने उभारल्या गुढ्या

नाशिक : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयाबद्दल रयत क्रांती संघटनेच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी समर्थन करण्यात आले. त्यासाठी गुढी उभारण्यात आल्या.
Gudhas erected by 'Rayat' in support of the Agriculture Bill
Gudhas erected by 'Rayat' in support of the Agriculture Bill

नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयाबद्दल रयत क्रांती संघटनेच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी समर्थन करण्यात आले. त्यासाठी गुढी उभारण्यात आल्या. 

कृषी सुधारणा कायदा आणून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळणार आहे. निर्णयाचे समर्थन करण्यासाठी जिल्ह्यातील रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतात गुढी उभारून निर्णयाचे स्वागत करत पाठिंबा दर्शविला. 

शेतकऱ्याची मार्केटिंग व्यवस्था बाजार समितीच्या जाचातून मुक्त होईल. शेतमाल बाहेर विकण्याची मुभा मिळणार आहे. सरकारी हस्तक्षेप कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांची भिती नष्ट होणार असल्याचे संघटनेचे प्रांतिक सदस्य दीपक पगार यांनी सांगितले. सर्वांनी या कायद्याचे स्वागत करावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव म्हणाले, ‘‘ शेतकऱ्यांना स्वातंत्र्य बहाल करणारी तीन विधेयके केंद्र शासनाने लोकसभा व राज्यसभेत मंजूर करून शेतकऱ्यांना स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालाचे स्वातंत्र्य लाभले आहे. ही मागणी शरद जोशी यांची ४० वर्षांपासून होती. परंतु, त्यावर निर्णायक भूमिका कोणत्याही शासनाने घेतलेली नव्हती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com