हापूसवर तुडतुडा, चिकट्याची भीती

Hapus mango on Hopper and chiktya disease
Hapus mango on Hopper and chiktya disease

रत्नागिरी ः सध्या बदललेल्या वातावरणाचा परिणाम आंबा, काजू पिकावर मोठ्या प्रमाणात होत आहे. थंडीअभावी आंब्याला फुटवा आलेला नाही, तर कलमे पालवलेलीच आहेत. गेले दोन दिवस ढगाळ वातावरणामुळे तुडतुडा, चिकटा पडण्याची भीती आहे. काही ठिकाणी मोहरावरावर तुडतुडा पडल्याचे आंबा बागायतदारांकडून सांगितले जात आहे.

डिसेंबर महिन्यात कडाक्याची थंडी पडेल आणि त्यानंतर पालवलेली कलमे मोहरतील असा अंदाज अनेक बागातयदारांकडून वर्तविला जात होता; परंतु निसर्गाकडून पाहिजे तेवढी साथ मिळत नसल्याने निराशा पसरली आहे. क्यार वादळामुळे पाऊस लांबल्याने थंडीला उशीर झाला आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत पावसाचे सावट होते. त्यानंतर बहुतांश कलमे पालवली होती. 

पालवी जून होण्यासाठी आवश्यक वातावरण अद्यापही तयार झालेले नाही. पारा सातत्याने २० अंश सेल्सिअस खाली राहिला तरच आंबा तयार होण्याच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. मध्येच गुलाबी थंडी, पुन्हा उष्मा अशी स्थिती बऱ्यापैकी आहे. त्यामुळे फुटवा यायला उशीर होणार हे निश्‍चित आहे. डिसेंबर सरत आला तरीही मोहर आला नसल्याने प्रत्यक्ष उत्पादन किती येईल, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात एक दिवसाआड ढगाळ वातावरण आहे. गुरुवारी (ता. २६) दिवसभर ढगाळ वातावरण होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com