लालपरीतून हापूस पोचला औरंगाबादला

राजापूर, जि. रत्नागिरी ः लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसानीच्या तोट्यामध्ये चाक रूतलेल्या ‘लालपरी’ने (एस.टी.) कोकणातील आंबा विविध भागांमध्ये पोहचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. रायपाटणसारख्या भागातून औंरगाबाद येथे सुमारे ३.५ टन आंबा घेऊन लालपरी धावली.
रत्नागिरी
रत्नागिरी

राजापूर, जि. रत्नागिरी ः लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसानीच्या तोट्यामध्ये चाक रूतलेल्या ‘लालपरी’ने (एस.टी.) कोकणातील आंबा विविध भागांमध्ये पोहचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. रायपाटणसारख्या भागातून औंरगाबाद येथे सुमारे ३.५ टन आंबा घेऊन लालपरी धावली.

लॉकडाऊनचा फटका एसटी सेवेलाही बसला. गावोगावी धावणाऱ्या या लालपरीची चाके गेल्या काही दिवसांपासून रूतून बसली आहेत. लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणल्याने काही मार्गांवरील लालपरी आता धावू लागली आहे. आंब्या पेट्या वाहतुकीसाठी सद्यःस्थितीमध्ये न परवडण्यासारखे भाडे आकारले जात असताना कमी दरामध्ये सुरक्षितपणे एसटी आंबा पेट्या मार्केटमध्ये पोहचवत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

लॉकडाऊनमध्ये शासनाने जारी केलेल्या अटी आणि शर्थींची पूर्तता करून आंबा मार्केटमेध्ये पाठविताना छोट्या व्यापाऱ्यांच्या नाकी दम येत होता. या व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांच्या सेवेला सर्वसामान्यांची लालपरी आता धावून आल्याने साऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

तालुक्यातील राटपाटण येथील कोकणबाग शेतकरी समुहाचा सुमारे साडेतीन टन आंबा घेऊन एसटी औरंगाबाद येथे रवाना झाली, असे राजापूर येथील कोकणबाग समुहाचे संचालक महेश पळसुलेदेसाई यांनी सांगितले. यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळाले. एसटीतून आंबा पेट्यांची वाहतूक झाली असली तरी एवढ्या मोठ्या संख्येने हापूसच्या पेट्यांची प्रथमच वाहतूक झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com