आंदोलनात हरियानाचे शेतकरी नाहीत : मुख्यमंत्री खट्टर

शेतकरी आंदोलनात हरियानाच्या शेतकऱ्यांचा सहभाग नाही, आंदोलक शेतकरी पंजाबचे आहेत, असे प्रतिपादन हरियानाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी केले आहे. खट्टर यांनी हे वक्तव्य करून आंदोलनापासून हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे.
आंदोलनात हरियानाचे शेतकरी नाहीत : खट्टर Haryana farmers not in agitation: Khattar
आंदोलनात हरियानाचे शेतकरी नाहीत : खट्टर Haryana farmers not in agitation: Khattar

चंडीगड  : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात हरियानाच्या शेतकऱ्यांचा सहभाग नाही, आंदोलक शेतकरी पंजाबचे आहेत, असे प्रतिपादन हरियानाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी केले आहे. खट्टर यांनी हे वक्तव्य करून आंदोलनापासून हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे. खट्टर म्हणाले, ‘‘हरियानातून आंदोलक शेतकरी दिल्लीकडे जात असताना रस्त्यांवर लावलेले अडथळे आंदोलकांनी काढून टाकले. अनेक वेळा तणावाची स्थिती निर्माण झाली, मात्र हरियाना पोलिसांनी अत्यंत संयमाने आंदोलन हाताळले.’’ पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीमार, अश्रू धुराची नळकांडी फोडल्याचा आरोप केला जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर खट्टर यांचे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.  पंजाबचे मुख्यमंत्री जबाबदार  दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाबद्दल खट्टर यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना जबाबदार धरले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कार्यालय आंदोलकांचे नेतृत्व करीत आहे. पंजाबचे शेतकरी विरोध प्रदर्शन करीत आहेत. हरियानाचे शेतकरी या आंदोलनापासून दूर आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री आंदोलकांना प्रोत्साहन देत आहेत, असा आरोप ही मुख्यमंत्री खट्टर यांनी केला आहे. .

मोदींच्या गर्विष्ठपणाचा शेतकऱ्यांना त्रास : राहुल गांधी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गर्विष्ठपणामुळे एका सैनिकाचा वृद्ध शेतकऱ्याला मार बसला, असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी (ता. २८) केला.  राहुल गांधी यांनी म्हटले आहे, ‘‘हा एक अतिशय दु:खी फोटो आहे. आमचा नारा ''जय जवान, जय किसान'' होता, पण पंतप्रधान मोदींच्या बढाईखोरपणामुळे आज एक सैनिक शेतकऱ्यांविरोधात उभा आहे. हे खूप धोकादायक आहे.’’ त्यांनी एक फोटो ट्विट केला आहे. त्यात एक सैनिकात एका वृद्ध शेतकऱ्यावर लाठी उगारताना दिसत आहे.  कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदींनी कॉर्पोरेट कार्यालयात फोटो काढत बसण्यापेक्षा दिल्लीत रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करावी, असे म्हटले आहे. पंतप्रधानांनी विमानात उड्डाण करण्याऐवजी रस्त्यावरच शेतकऱ्यांशी चर्चा करावी, असा ही टोला लगावला आहे. पक्षाचे दुसरे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी, ‘जो कोणी मोदी सरकारविरोधात निषेध करतो, त्याला दहशतवादी मानले जाते,’ अशी टीका केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com