`ऊस उत्पादकांवरील अन्याय सहन करणार नाही`

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर  ः पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत शासकीय लेखापरीक्षक चुकीची तपासणी करत आहेत. त्यांनी त्यात तत्काळ दुरुस्ती करावी किंवा तपासणी बंद करावी; पण शेतकऱ्यांचे नुकसान करू नये. पूरग्रस्त ऊस उत्पादकांवरील अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा आमदार हसन मुश्रीफ व माजी खासदार राजू शेट्टी यांनी संयुक्त पत्रकातून दिला आहे.

अतिवृष्टीमुळे ऊस पिकाचे अपरिमित नुकसान झाले आहे. याबाबत शासनाने २३ व २७ ऑगस्टला नुकसानीची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. तथापि आदेशानुसार तपासणी होत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून आपल्याकडे येत आहेत. बाधित शेतकऱ्यांनी संबंधित बॅंकेच्या मंजूर प्रतिहेक्‍टरी पीक कर्ज दरानुसार कमाल एक हेक्‍टरच्या उत्पादनासाठी प्रत्यक्ष उचल केलेली व परतफेड न केलेली रक्कम कर्जमाफीस पात्र आहे, असा शासन निर्णय झाला आहे. त्याप्रमाणे जिल्हा तज्ज्ञ समितीने ठरवलेल्या पीक कर्ज दराप्रमाणे नुकसानभरपाई द्यायची आहे, असे या पत्रकात म्हटले आहे.

२०१९-२० मध्ये ऊस पिकासाठी हेक्‍टरी ९५ हजार कर्ज देण्याचे ठरले. प्रतिगुंठा ही रक्कम ९५० रुपये येते. त्याप्रमाणे पंचनामा यादीतील जेवढे क्षेत्र बाधित आहे, तेवढ्या क्षेत्राला ९५० रुपयांप्रमाणे कर्जमाफीचा लाभ देणे आवश्‍यक आहे. तथापि असा लाभ दिला जात नाही. याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक यांनी नोंद घ्यावी व तत्काळ दुरुस्ती करून जास्तीत जास्त पूरग्रस्त शेतकरी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, फेरपंचनामे करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com