पुणे : कोकणातील काही भागांत असलेले ढगाळ वातावरण निवळले आहे. राज्यात आकाश निरभ्र झाले आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांत उन्हाचा चटका वाढू लागला आहे. येत्या काही दिवसांत उन्हाच्या झळा तीव्र होईल. शनिवारी (ता.२७) सकाळी चोवीस तासांत सोलापूर येथे ४०.३ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. सध्या दक्षिण छत्तीसगडच्या काही भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. त्याचा काहीसा परिणाम विदर्भाच्या भागावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील अनेक भागात उकाड्यात वाढ होईल. कोकण व विदर्भात कमाल तापमानात वाढ झाली असून कमाल तापमानाचा पारा चाळीशीपार गेला आहे. आजपासून राज्यातील जवळपास सर्वच भागातील ढगाळ वातावरणाची स्थिती निवळल्याने आकाश कोरडे झाले आहे. उन्हाचा पारा वाढू लागल्याने कोकणातील कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. मुंबई, रत्नागिरी भागात कमाल तापमान ४० अंश सेल्सिपर्यंत गेले आहे. रत्नागिरीमध्ये ४०.० अंश सेल्सिअसची नोंदविले गेले. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान कमीअधिक असून ३२ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान आहे. मराठवाड्यातही कमाल तापमानही वाढू लागले. या भागात ३६ ते ३८ अंश सेल्सिअस, तर विदर्भात ३६ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान होते.
शनिवारी (ता.२७) सकाळपर्यंतच्या २४ तासात विविध शहरातील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.