पुणे ः राज्यात आकाश निरभ्र झाल्याने उन्हाचा चटका वाढत आहे. त्याचबरोबर थंडी कमी होऊन किमान तापमानाचा पारा वाढू लागला आहे. येत्या काही दिवसांत किमान तापमानात वाढ होईल. शनिवारी (ता. ६) सकाळी आठ वाजेपर्यंत निफाड येथील गहू संशोधन केंद्राच्या आवारात १२ अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत कमाल तापमानाचा पारा चढत आहे. राज्यासह उत्तर भारतातही कमाल तापमानात वाढ होत आहे. सौराष्ट्र आणि कच्छमधील भूज-रुद्रमाता येथे कमाल तापमानाची नोंद ४० अंश सेल्सिअस एवढी झाली आहे. उत्तराखंड, पंजाब, बिहार आणि विदर्भ, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक किनारपट्टी या भागांत कमाल तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. विदर्भात सकाळपासून ऊन वाढत असल्याने झळा चांगल्याच तीव्र होत आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत गेला आहे. चंद्रपूर, अकोला या भागांत कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. तर अमरावती, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वाशीम या भागांत ३५ ते ३८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान आहे.
मराठवाड्यातही ऊन वाढू लागले आहे. त्यामुळे कमाल तापमान ३६ ते ३७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. तर किमान तापमान १४ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मध्य महाराष्ट्रातही कडाक्याचे ऊन वाढू लागले आहे. जळगाव येथे ३८.५ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमान नोंदविले गेले असून, सोलापूर, पुणे, मालेगाव भागांतही ऊन वाढत आहे. कोकणातही कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. सांताक्रूझ येथे ३७ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान गेले आहे.
शनिवारी (ता.५) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.