कोल्हापुरात उन्हाचा चटका वाढला

जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून उन्हाच्या चटक्यात वाढ होत आहे. ढगाळ हवामान व रणरणते ऊन यामुळे शेतकऱ्यांना ही खरिपाचे व्यवस्थापन करताना आव्हाने निर्माण झाली आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून मोसमी पाऊस जवळ जवळ थांबला आहे. यामुळे धरणांतील पाणी सोडण्याचे प्रमाण ही अत्यल्प आहे.
The heat wave intensified in Kolhapur
The heat wave intensified in Kolhapur

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून उन्हाच्या चटक्यात वाढ होत आहे. ढगाळ हवामान व रणरणते ऊन यामुळे शेतकऱ्यांना ही खरिपाचे व्यवस्थापन करताना आव्हाने निर्माण झाली आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून मोसमी पाऊस जवळ जवळ थांबला आहे. यामुळे धरणांतील पाणी सोडण्याचे प्रमाण ही अत्यल्प आहे.

काही ठिकाणी बंद करण्यात आले आहे. पण गेल्या आठ दिवसांत दिवसभर कडक ऊन सायंकाळी वळीव सदृश पाऊस असे हवामान तयार होत आहे. पारा ३२ अंशापर्यंत गेला आहे. यामुळे आगाप पेरणी झालेल्या सोयाबीनची काढणी करताना शेतकऱ्यांची त्रेधा तिरपीट उडत आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात बहुतांशी भागात सोयाबीनचे पीक घेतले जाते.

सोयाबीनची पेरणी साधारणतः: मे च्या शेवटच्या आठवड्यात केली जाते यामुळे सोयाबीन काढणीला सप्टेंबरच्या मध्यापर्यंत सुरुवात होते. येथे सध्या शिरोळ हातकणंगले तालुक्यातील काही सोयाबीनचे प्लॉट काढण्यासाठी आलेले आहेत. मात्र, दिवसभर कडक उन्हाचा तडाखा आणि सायंकाळी चार पाच नंतर आकाशात निर्माण होणारे काळे ढग शेतकऱ्याला अस्वस्थ करत आहेत.

वांगी पिकाची शाखीय वाढ झालेली असते त्यामुळे त्यावर शेंड अळी मोठ्या प्रमाणात येते. नवीन ऊस लागणीवर नुकत्याच भरणी केलेल्या उसावर खोड कीड येऊ शकते. हुमनीचा प्रसार वाढीस पोषक हवामान असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com