अतिवृष्टीनंतर आता धुक्‍याचे संकट 

अतिवृष्टीनंतर आता धुक्‍याचे संकट
अतिवृष्टीनंतर आता धुक्‍याचे संकट

महाळुंगे पडवळ, जि. पुणे : आंबेगाव तालुक्‍यातील महाळुंगे पडवळ, साकोरे, चास, लौकी, कळंब आदी ३० गावांत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पडत असलेल्या धुक्‍यामुळे भाजीपाला पिकांवर करपा, तांबेरा, डाउनी, भुरी रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे उत्पादनखर्चात वाढत आहे. अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीमुळे खचलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. 

शेतकऱ्यांनी बटाटा, टोमॅटो, कारली, कांदा, सोयाबीन, बीट, काकडी, दोडका, आले आदी प्रमुख पिके घेतली आहेत. गेल्या १५ दिवसांपूर्वी चास, साकोरे, महाळुंगे पडवळ परिसरात मुसळधार पाऊस झाला. या पावसात अनेक सखल भागातील पिके सडून गेली आहेत. परंतु पाण्याचा निचरा झालेल्या जागेतील पिके पावसातून वाचली आहेत, त्यातच गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सकाळी आठ ते नऊपर्यंत पडत असलेल्या धुक्‍यामुळे पिकांवर रोगराईचे प्रमाण वाढले आहे. धुके असताना आणि धुके निवळताना दवबिंदूच्या स्वरूपात जमा होणारे पाणी पिकांच्या नासाडीस कारणीभूत ठरत आहे. 

‘‘लौकी येथे दोन एकर क्षेत्रात बटाटा लागवड केली आहे. नुकत्याच मुसळधार पावसातून पीक वाचविण्यात यश आले. परंतु दोन दिवसांपासून पडत असलेल्या धुक्‍यामुळे १० ते १५ टक्के बटाट्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे,’’ अशी माहिती शेतकरी अशोक थोरात यांनी दिली.

धुके पडल्यामुळे पिकांवर करपा व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. अन्नद्रव्ये शोषण प्रक्रिया मंदावून झाडांचे नुकसान होते. प्रादुर्भाव झालेली पिके आढळून आल्यास शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या.  -टी. के. चौधरी, तालुका कृषी अधिकारी, आंबेगाव   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com