वादळी वारे, पावसाचा रब्बी पिकांना जोरदार तडाखा

वादळी वाऱ्यामुळे अडीच एकरवरील गहू, ज्वारी तसेच भाजीपाला पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी. - पंडित थोरात, शेतकरी, खानापूर, जि. परभणी.
crop damage
crop damage

नांदेड: रब्बी पिकांची सुगी सुरू असताना वादळी वारे, पूर्वमोसमी पावसामुळे हाती आलेल्या पिकांचे होत्याचे नव्हते होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांंमध्ये वादळी वारे, जोरदार पावसामुळे रब्बी पिके, फळपिके, भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करुन आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली, माहूर, हिमायतनगर आदी तालुक्यात सोमवारी (ता. ९) आणि मंगळवारी (ता. १०) वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यासह अन्य काही तालुक्यात हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. सध्या सुरुवातीला पेरणी केलेल्या ज्वारी, गहू, हरभरा आदी रब्बी पिकांची सुगी सुरू आहे. परंतु उशिरा पेरणी केलेली गहू, ज्वारी पीके अजून शेतात उभी आहेत. वादळी वाऱ्यामुळे हि पिके आडवी झाली आहेत. संत्र्यामध्ये फळगळ, आंब्यामध्ये मोहर गळ झाली आहे. भाजीपाला पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती कृषी विभागाला कळविण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com