सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या उताऱ्यात घट

यंदा पावसामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात एकरी उतारा कमी झाला. त्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. - तात्यासो नागावे,शेतकरी, खटाव, जि. सांगली.
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या उताऱ्यात घट
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या उताऱ्यात घट

सांगली : महापुरात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले. त्यातून बचावलेल्या सोयबीन पिकांची काढणी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. मात्र, उतारा कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू लागला आहे.

जिल्ह्यात ३८ हजार ५०६ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. पीक चांगले बहरू लागले होते. मात्र, ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात महापूर आला. यामुळे पिकात पाणी साचून राहिले होते. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू झाला. त्यामुळे सोयाबीनची काढणी रखडली होती. पावसाची उघडीप मिळाल्याने शेतकरी सोयाबीन काढणीची लगबग सुरू झाली आहे. एकाच वेळी सोयाबीनची काढणी आली आहे. यामुळे मजूर वेळेत मिळत नाही. त्यामुळे शेतकरी पाच ते सहा दिवस अगोदरच मजुरांचे नियोजन करत आहेत. सोयाबीन काढणीला एकरी  ३००० ते ३२०० रुपये घेतले जात आहेत.

यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. शेतात पाणीसाचून राहिले होते. त्यामुळे पिकाची वाढ अपेक्षित झाली नाही. त्याचा फटका उत्पादनावर झाला आहे. गेल्यावर्षी सरासरी एकरी १२ ते १५ क्विंटल उत्पादन मिळाले होते. मात्र, या महापुरामुळे एकरी ९ ते १० क्विंटल उत्पादन मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

मळणी महागली  सातत्याने डिझेलचे दर वाढत असल्याने ट्रॅक्टर मालकांनी मळणीचे दर वाढविले आहेत. गेल्या वर्षी एका पोत्याला १५० रुपये असा दर शेतकऱ्यांकडून घेतला जात होता. या वर्षी ५० रुपयांनी वाढ केली असून आता एका पोत्याला २०० रुपये असा दर आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com