नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार हेक्टरला फटका

यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला पाऊस आहे. पिकांची स्थितीही बरी आहे. मात्र शेतीवरील नैसर्गिक आपत्तीची मालिका थांबायला तयार नाही. यंदा मार्च महिन्यापासून जुलैपर्यंत जिल्ह्यामधील तब्बल चार हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नैसर्गिक आपत्तीने ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले झाले आहे.
Heavy rains hit 4,000 hectares in Nagar district
Heavy rains hit 4,000 hectares in Nagar district

नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला पाऊस आहे. पिकांची स्थितीही बरी आहे. मात्र शेतीवरील नैसर्गिक आपत्तीची मालिका थांबायला तयार नाही. यंदा मार्च महिन्यापासून जुलैपर्यंत जिल्ह्यामधील तब्बल चार हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नैसर्गिक आपत्तीने ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले झाले आहे.

या आपत्तीत साडेतीनशे गावांतील नऊ हजार शेतकरी बाधित झाले. झालेल्या नुकसानीत सुमारे पंचवीस कोटी रुपयापेक्षा अधिक रकमेचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सरकारी नियमानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी १२ कोटीची गरज आहे. प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

नगरसह राज्यातील बहुतांश भागात यंदा पावसाची स्थिती चांगली आहे. मात्र तरीही सातत्याने शेतीवर आपत्ती येतच आहे. मार्च ते जुलै या महिन्यात वेगवेगळ्या कारणाने पिकांचे नुकसान झाले आहे. खास करून अधिक चक्री वादळ आणि अधिक च्या पावसानेच नुकसान झाले आहे. जसे नुकसान होईल त्यानुसार प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. सर्वाधिक नुकसान जूनमध्ये झाले आहे.

या नुकसानीत पॉलिहाऊस, शेडनेटचे नुकसान ग्राह्य धरले नाही. जिल्हाभरात शेडनेट, पॉलिहाऊसचही कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. नुकसानीपोटी बारा कोटी रुपये भरपाई देण्याला हवे आहेत.

सप्टेंबरमध्येही मोठे नुकसान   नगर जिल्ह्यातील नेवासा, नगर, पारनेर, राहाता, राहुरी, कोपरगाव, संगमनेर, अकोले, शेवगाव, पाथर्डी तालुक्यात आॅगस्ट महिन्यात फारसे नुकसान नसले तरी सध्या सुरू असलेल्या सप्टेंबर महिन्यात सुरू असलेल्या जोरदार पावसाचा मोठा फटका बसला आहे. या महिन्यात बाजरी, कापूस, सोयाबीन, भुईमुगासह ऊस व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याचा अजून अहवाल आलेला नसला तरी या महिन्यातही शेतीवर मोठी आपत्ती आल्याचे जाणकार सांगतात.

शेतकऱ्यांना सोसावे लागणार नुकसान शासनाच्या नियमानुसार आपत्तीने ३३ टक्क्यापेक्षा जास्ती नुकसान झाले तरच भरपाई दिली जाते. मात्र ३३ टक्क्यापेक्षा कमी झालेले नुकसानही अधिक आहे. त्या नुकसानीची प्रशासन अथवा कृषी विभाग नोंद ठेवत नाही, मात्र जाणकारांच्या माहितीनुसार गेल्या पाच महिन्यात पाच ते सहा हजार हेक्टरवर ३३ टक्क्यापेक्षा कमी नुकसान झाले आहे. त्यातूनही नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना साधारण दहा कोटीचा फटका बसल्याचा अंदाज आहे. मात्र त्याची भरपाई मिळणार नसल्याने ते नुकसान शेतकऱ्यांनाच सोसावे लागणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com