खानदेशात अतिपावसाने  कापूस पीकस्थिती बिकट 

खानदेशात पूर्वहंगामी कापूस पिकाची स्थिती बिकट बनली आहे. अतिपावसाने पिकातील कैऱ्या, बोंडांचे मोठे नुकसान होत आहे. वेचणीवर आलेल्या कापसात बोंडांचा अक्षरशः चिखल बनत आहे.
  खानदेशात अतिपावसाने  कापूस पीकस्थिती बिकट  Heavy rains in Khandesh Cotton crop conditions are critical
  खानदेशात अतिपावसाने  कापूस पीकस्थिती बिकट  Heavy rains in Khandesh Cotton crop conditions are critical

जळगाव : खानदेशात पूर्वहंगामी कापूस पिकाची स्थिती बिकट बनली आहे. अतिपावसाने पिकातील कैऱ्या, बोंडांचे मोठे नुकसान होत आहे. वेचणीवर आलेल्या कापसात बोंडांचा अक्षरशः चिखल बनत आहे.  फक्त कापूस पीक तेवढेच खानदेशात बऱ्या अवस्थेत होते. परंतु या पिकालादेखील अतिपावसाने झोडपले आहे. यापूर्वी उडीद, मूग आदी पिके जून, जुलैमधील पावसाच्या ओढीने हातची गेली. दुबार, तिबार पेरणी करावी लागली. ऑगस्टच्या मध्यानंतर पावसाचे आगमन झाले. तेव्हापासून पाऊस सुरूच आहे. ऑगस्टअखेर पूर्वहंगामी कापूस पिकात वेचणी सुरू होण्याची स्थिती होती. काही दिवस कोरडे वातावरण अपेक्षित होते. परंतु वातावरण खराब होत गेले. सतत पाऊस सुरू आहे. गेले १० दिवस जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात पाऊस रोज येत आहे. यामुळे पिकांची स्थिती अधिक बिकट बनली आहे. काही भागात उडीद, मूग ही पिके काढणीवर आहेत. सोयाबीन काढणीवर येत आहे. परंतु पाऊस सुरू असल्याने कापणी, वेचणी, काढणी, मळणी आदी कार्यवाही बंद आहे. शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. कारण पीक हातचे जात आहे.  खानदेशात पीक प्रमुख कापूस आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे पाच लाख १८ हजार, धुळ्यात दोन लाख २० हजार आणि नंदुरबारात एक लाख १४ हजार हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. यात पूर्वहंगामी कापूस पिकाखालील क्षेत्र सुमारे सव्वालाख हेक्टर एवढे आहे. मेच्या अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड झाली होती. या पिकाची स्थिती ऑगस्टच्या सुरुवातीला चांगली होती. परंतु आता अतिपावसाने पीक लाल, पिवळे, काळे पडत आहे. कैऱ्या, बोंडे लालसर, काळवंडत आहेत. पिकाचा दर्जा सतत घसरत आहे. यामुळे उत्पादकतेवर मोठा परिणाम होत असून, शेतकऱ्यांनुसार एकरी फक्त तीन ते साडेतीन क्विंटल उत्पादन पूर्वहंगामी किंवा बागायती कापूस पिकात मिळेल, अशी स्थिती आहे. उत्पादन खर्चही निघणार नाही, असेही शेतकरी सांगत आहेत.  जळगाव, धुळे व नंदुरबारात अतिवृष्टी झाल्याची स्थिती आहे. जळगावमधील चाळीसगाव, जामनेर, जळगाव, चोपडा, अमळनेर, पारोळा, भडगाव, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, धरणगाव, एरंडोल या सर्वच तालुक्यांमध्ये काळ्या कसदार जमिनीत कापूस पिकाची स्थिती बिकट आहे. शेतातील सखल भागात पाणी तुंबले आहे. धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, धुळे, साक्री भागातही कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे. नंदुरबारमधील तळोदा, शहादा, नंदुरबार, अक्कलकुवा, नवापूर येथेही पूर्वहंगामी कापूस पिकात किमान ५० ते ६० टक्के नुकसान झाले आहे. 

प्रतिक्रिया कापूस पिकाची स्थिती अतिपावसाने बिकट बनली आहे. एकरी दोन ते तीन क्विंटलही उत्पादन येणार नाही. उत्पादन खर्चही हाती येईल की नाही, याबाबत शंका आहे.  - राजाराम पाटील, शेतकरी, भडगाव, जि. जळगाव  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com