सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

सातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे. कराड, पाटण तालुक्यातील पूरस्थिती कमी होऊ लागली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकूण सरासरी  ४७.४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या आठ ते दहा दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने बुधवारी तुलनेत जोर कमी झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना तसेच पूरबाधित असलेल्या लोकांना दिलासा मिळाला आहे. नदीचे पाणी गावात आलेले अनेक कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले होते. मुसळधार पावसाने कोणीही हानी होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने माण वगळता दहा तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक विद्यालयास सुट्टी दिली आहे. 

पावसाचा जोर ओसल्याने जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. कोयना धरण क्षेत्रातील पाऊस जोर ओसरला असल्याने या धरणातील पाण्याचा विसर्ग कमी केला आहे. कोयना धरणात दुपारी एक वाजता १०२.६५ टीएमसी एवढा पाणीसाठा असून कोयना धरणाचे दरवाजे दुपारी एक वाजता आठ फुटावर आणले असून ६८ हजार ४१२ क्युसके विसर्ग केला जात आहे. तसेच धोम -१४, ५९६ कण्हेर - ९,७३४, उरमोडी - ५, ६४३, तारळी - ८,०७२ विसर्ग केला जात आहे.

सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा टीएमसीमध्ये पुढीलप्रमाणे- कोयना- १०२.६५, धोम-१०.२०, धोम-बलकवडी-३.४२, कण्हेर-८.४४, उरमोडी- ८.९४, तारळी-५.१५, नीरा देवघर- ११.२७, भाटघर- २२.८६, वीर-८.६०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com