नवी दिल्ली : दक्षिण भारतानंतर आता उत्तर भारतही पावसाच्या तडाख्यात सापडला आहे. दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, उत्तराखंडमध्ये पाऊस व पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३४ झाली असून, या राज्यांत अति दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. यमुना व अन्य नद्या दुथडी भरून वाहत असल्याने दिली, हरियाना, पंजाब आणि उत्तर प्रदेशमधील काही भागात पुराचा इशारा दिला आहे. यमुनेवरील हाथिनी कुंड धरणातून ८.२८ लाख क्युसेक पाणी सोडण्यात येत असल्याने हरियाना सरकारने लष्कराला तयारीत राहण्याची सूचना दिली आहे. पावसामुळे हिमाचल प्रदेशात आतार्पंयत दोन नेपाळी नागरिकांसह २२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर नऊ जण जखमी आहेत. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४३ झाली असल्याचे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी आज दिली. उत्तराखंडात झालेल्या ढगफुटीत नऊ जणांचा मृत्यू झाला असून २२ जण बेपत्ता आहेत. पंजाबमध्ये तीन जणांचा बळी गेला आहे. दिल्लीत खबरदारी हरियानातील हथिनी धरणातून यमुनेत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले असल्याने सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना दिल्ली प्रशासनाने उभारलेल्या निवारा केंद्रात आश्रय घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. यमुनेची पाणी पातळी सकाळी २०४.८ मीटरपर्यंत पोचली होती. २०१८ मध्ये ही पातळी २०६.०५ मीटर होती. १९७८ मध्ये यमुना नदीचे पाणी २०७.४ मीटरवरून वाहत होते.
बंगालमध्ये सुधारणा; ओडिशात पावसाचा इशारा कोलकाता ः पश्चिम बंगालमधील कोलकात्यासह अन्य भागात पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीत सुधारणा होत आहे. दोन दिवसांपूर्वी येथे मुसळधार पाऊस पडून अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे अनेक ठिकाणचा संपर्क तुटला होता. पश्चिम बंगालचे शेजारील ओडिशात पुराचा धोका मागे घेतला आहे. मात्र पुढील दोन दिवसांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दिल्ली
हिमाचल प्रदेश
उत्तराखंड
उत्तर प्रदेश
पंजाब
केरळ, कर्नाटकमधील बळींची संख्या १९७ बंगळूर/वायनाड ः कर्नाटकमध्ये आलेले पुरातील बळींची संख्या ७६ वर पोचली आहे, तर दहा जण बेपत्ता आहेत. केरळमधील बळींची संख्या १२१ झाली आहे. वायनाड जिल्ह्यात दरडी कोसळल्याच्या घटनांमधील मृतदेह अजून सापडत आहेत. केरळमधील मल्लपुरममधील कवलपारा आणि वायनाड जिल्ह्यातील पुथुमला येथील दरडीखालील मृतदेहांचा शोध घेण्यासाठी जमीन भेदक रडारचा वापर केला जात आहे. कर्नाटकमध्ये ५०० निवारा केंद्र अजूनही सुरू असून दोन लाख नागरिकांना निवारा अन्न व पाणी पुरविण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तमिळनाडूसह शेजारील राज्यांत पुढील दोन दिवसांत मोठ्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
केरळमधील मदत :
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.